Sunday, February 28, 2010

धन्य मातोश्री धन्य जिजाबाई (पोवाडा) – शाहीर विष्णूपंत कर्डक

धन्य मातोश्री धन्य जिजाई जन्म दिला तिनं शिवबाला ।
पारतंत्र्याची तोडून शृंखला स्वतंत्र करण्या देशाला ।
हिदुस्थानामध्यें हिरवं निशाण फडकू लागलं यवनांच ।
नाम निशाण मग मोडु लागलं स्थाईक हिंदु लोकांच ॥
जिकडे तिकडे जुलुम यवनाचा छळती हिन्दु लोकांना ।
भर रस्त्यामध्यें गाई कापिती । शिवबाला हे सहन होईना ।
हिंदु अबलांना पळवून नेती, लावती आपल्या ते कामा ।
बळजबरीने करती मुसलमान पढवित होते कलमा ।
थोर थोर लढवय्ये मराठे संरक्षक ते राष्ट्राचे ।
पारतंत्र बेडीने जखडले गुलाम बनले यवनांचे ॥
देश पसरले परकीय जाळे । हिन्दु बांधवांचा होतो छळ ।
जिकडे तिकडे हलकल्लोळ । शेतकरी झाले कंगाल ।
मुला बाळांचे होते हाल । आया बहिणी रडती खळखळ ।
किती भटकती रानोमाळ । अस पाहून जीजाईचा बाळ ।
अंतर्यामी सदा जळफळ । कधी देश स्वतंत्र होईल ।
जैसा मत्स्य तळमळ उदकावीण । तैसा शिवाजी ।
स्वातंत्र्यास्तव रात्रंदीन तळमळ ॥
यवनांचा हा जुलूम पाहून शिवराय करि गर्जना ।
मर्द मराठयांना म्हणे बंधुनो कसा साहिता धिंगाना ।
आया बहिणींची अब्रू घेती लाज कशी रे धराना ।
बोडून मिशा भरुन बांगडया लुगडी कारे नेसाना ।
हिन्दुभूमीचे लेक म्हणविता कुठे गेला तुमचा बाणा ।
मायभूमी रसातळाला चालली नेत्र कारे उघडना ।
ढाल तलवार घेऊन भाला हरहर महादेव बोला ।
शत्रुवरी करुन हल्ला देश आपुला जिंकु चला ।
शिवबाची ऐकुन ही गर्जना मावळा उतरला समररंगणा ।
शिवबाला म्हणती सारे धर्मासाठी अर्पू प्राणा ।
मायभवानी सदा यशदानी तलवार देई शिवबाला ॥शिवरायाला कदा न विसरे सदा लटकली कमरेला ।
स्वातंत्र्यासाठीं सारा मावळा लढे संगरी जोमात ।
जिकडे तिकडे मग भगवा झेंडा फडकू लागला किल्ल्यात ।
सारा मावळा एकवट आला । लढू लागला रणांगणाला ।
धर्माचे रक्षण करण्याला देशासाठी अर्पिती प्राणाला ।
जर्जर करिती आपुल्या शत्रुला । किती तरी मग देश जिंकला ।
शिवाजीला राजा केला । सदा वंदिती जीजामातेला ।
अंबाभवानी कुल देवतेला । सुखी केलं आपल्या लोकाला ।
दिसती आनंदात मावळे मग दिसती आनंदात ।
मराठयांच भगव निशाण फडकु लागलं देशांत ॥
देशासाठी किती वीरांनी रक्त सांडूनी भूमीला ।
पारतंत्र्याची तोडूनी बेडी स्वराज्य केलं देशाला ।
शूरवीर नेताजी पालकर, उजवा हात तो शिवाजीचा ।
हिरोजी, बहिर्जी आणि सूर्याजी इंगा जिरवी शत्रूचा ।
मर्द मावळा शूर तानाजी सोडून पुत्राच्या लग्ना ।
स्वराज्यासाठी अर्पूनी प्राणा, घेतला कोंडाणा ।
मुरारबाजी मराठा पडला गड पुरंदरी लढतांना ।शीर तुटलं पर धडानं कापलं त्यान तीनशे हो लोकांना ।
पावन खिंडीमध्यें शिकस्त केली सुखी पोहचण्या शिवराणा ।
पांच तोफांचे आवाज होता । मग बाजी प्रभु सांडी प्राणा ।
हंबीरराव मोहीते मराठा मर्द गडी तो खंबीर ।
शिव कार्याला सदा तय्यार असे त्याची हो तलवार ।
असा किती वीर कामी आला । देश आपला जिंकण्याला ।
शिवाजी सारखा पुढारी मिळाला । म्हणून देश स्वतंत्र झाला ।
सुखी केला आपुल्या लोकाला । धन्यवाद देती शिवबाला ।
सारे नमिती भगव्या झेंडयाला । सदा तय्यार शिवकार्याला ।
मराठे सारे ते हो वीर । शिवरायाचा वाढु लागला विस्तार ॥ध्रु०॥
स्वराज्य स्थापूनी शिवरायाने सारा मावळा एक केला ।
जो जो आडवा झाला त्याला उभा धरुनी चिरीयेला ।
कितीक तरी थोर थोर मराठे स्वराज्यात करिती फाटाफुट ।
परि शिवराय स्वातंत्र्याची करी हो एकजुट ।
बहु प्रयत्ने् शिवरायाने देश आपुला जिंकिला ।
स्वातंत्र्याची मेढ रोवूनी धर्म आपुला रक्षियला ।
असा मोहरा महाराष्ट्राचा अभिमानी जो धर्माचा ।
दैव तयाला आड आले रोग झाला हो गुडघीचा ।
महाराष्ट्राचा हिरा हरपला तारा एकाएकी तुटला ।
मावळ देशाचा दिनमणी अंधार गडद पडला ।
धन्य शिवाजी धन्यच झाला । स्वराज्य स्थापिला ।आपल्या देशाला पारतंत्र्याची तोडून शृंखला ।
देश धर्म आपुला रक्षिला । नाव अजरामर करुन भूमिला ।
शिवराय ते गेले स्वर्गाला । दुःखित केलं आपल्या जनतेला ।
किती वर्णु मी त्यांच्या गुणाला ?
शिवरायानं जन्म घेतला । म्हणूनच हिंदु धर्म राहिला ।
त्यांना रामदास गुरु मिळाला । तुकारामानं उपदेश केला ।
अशा संतांचा लाभ झाला । मराठे तय्यार वेळेला ।
मातोश्रीची मात सारी ही, मातोश्रीची मात ।
शाहीर विष्णुपंत कर्डक गातो कवनात ॥ध्रु०॥

राजमाता जिजाऊ (पोवाडा) – शाहीर भगवान बाळाजी चव्हाण

धन्य धन्य जिजाऊ माता । त्यांची ही गीता ।
ऐकू जनहिता । विश्व प्रेमाची विमल मूर्ति ॥
मातृ देवता धन्य कीर्ती । पुण्यमय महाराष्ट्र धरती हां जी ॥१॥
पंधराशे अठ्ठण्णव साली । पौर्णिमा भली । पौषाची आली ।
जाधव घराण्यात धून घुमली ॥
’सिंदखेड राजा’ ग्रामी रमली । देव मंदिरे ही दुमदुमली हां जी ॥२॥
गगनास भिडे आनंद । ऐकू ये छंद । दिशाही धुंद । होवुनी गेल्या त्याच समयास ॥
शक्ति उतरली धर्म साह्यास । झाला संतोष सर्व हृदयास ॥जी॥३॥
(स्वगत : दिवसा मागून दिवस लोटले. जिजाऊ (राजकन्या) थोडया मोठया
झाल्या असतील आणि एक दिवस)
वेरुळकर मालोजी भोसले जहागीरदार
रंग पंचमी निमित्त आले जाणुनी परिवार ॥१॥सुपुत्र त्यांचे नाम शहाजी सोबत दिलदार
सहज समोरी तिथे पातली जिजाऊ सुकुमार ॥२॥
मालोजीना जाधव म्हणती बघा सून तुमची
रंग उधळुनी करते चेष्टा अपुल्या नवर्या ची ॥३॥
(आणि तोच शब्द नियतीने मालोजी राजांच्या पश्चात् खरा ठरवला.
जाधवराजांची कन्या महाराष्ट्राची राजमात होण्यासाठी बोहल्यावर चढली.)
नियतीने शब्द झेलला । खरा तो झाला ।
योगायोग आला । लग्न लागले मुहुर्तास ।
भूषण भोसले घराण्यास । पुणे प्रांतीय सूर्यवंशास ॥जी॥१॥
चालुनी सात पाऊले । भाग्य गृही आले । पुण्य उतरले ।
पाहुनी नवी सूनबाई ॥ कौतुक करती उमामाई । भेटली खरी अंबाबाई ॥२॥
घातला लग्न गोंधळ । उजळले स्थळ ।
गर्जे संबळ । स्वस्थता तरी मनी नव्हती ॥
प्रजाजन इथले हळहळती । दुष्ट येवुनी त्यांस पिडती ॥३॥
(स्वगत : असं काय घडलं होतं त्या वेळीं ?)
मंदिरे नष्ट ती झाली । व्याकुळता येथें आली ।
ना कोण कुणाचा वाली । आंदोळुन पृथ्वी गेली ।
पापी ते जाहले पुष्ट । देती ते कष्ट ।
संस्कृती नष्ट । ही जीर्ण अवस्था केली । तरु लता उन्मळून मेली ॥
चाल : १
त्या समई भयानक स्थिती । इतिहासा प्रति ।
वर्णिली इति । भूतळी कहर एक झाला ॥
सत्य सन्मार्ग तिथे हरला । पुण्य प्रेमाचा उदय विरला ॥१॥
उसळुनी क्रोध अंगात । राक्षसे घात ।
करती रस्त्यात । जगया नको जीवन करती ॥
भगिनी भ्रष्ट त्या कितीक मरती । प्रेत पाहुनी नयन भरती ॥२॥
येवुनी पूर्ण ही ग्लानी । झाली ती हानी ।डाली अवनी । काम मोहाचा आला संचार ॥
नियतीने केला होता अविचार । कळेना कुणा धर्म सुविचार ॥जी॥
(सत्य हा सर्वाचा एकच धर्म आहे याच मताच्या आऊ साहेबा होत्या. आणि म्हणून....)
आऊ साहेबा जिजा माउली खर्या् ’लोकमाता’
जन कल्याणा करीत होत्या हृदयातून चिन्ता ॥१॥
वाद तयांचा अखेर होता दुष्ट दुर्जनांसी (कारण) ?
कारण होत जगता यावे संत सज्जनांसी ॥२॥
(स्वगत : समृद्ध भारतावर परकीयांनी आक्रमण केलं,
प्रजेला लुटलं आणि त्यांची सेवा केली मात्र, आपल्याच लोकांनी.)
चाल : ४
इथे होते मराठी राजे गुलाम बनलेले । जी॥
संस्कृतीवान राष्ट्राचे तुकडे पडलेले । जी॥
शत्रूला मित्र ही होते फितूर झालेले । जी॥
स्वातंत्र्य सूर्य बुडविण्या नित्य टपलेले ॥जी॥
(स्वगत : या विकृतीच जिजाऊनी निरीक्षण केलं आणि ....)
पाहुनी ऐशी विकृती । सांगते सती ।
ऐका हो पती । अलंकार घडवा एक मजला ॥
करा स्वातंत्र्य हिन्द अबला । विनविते विनंतीने सुबला हा जी ॥१॥
ना तरी जीवन हे व्यर्थ । जळो हा स्वार्थ ।
ऐका परमार्थ । लोक हे करा संघटीत ॥
मारावी शत्रू संगे जीत । जन्म भूमिची ठेवा प्रीत ॥२॥
मी तुमची हृदय नायिका । खरी सेविका ।
गडबडू नका । प्रतिज्ञा हृदय जोडण्याची ॥
नाही कोणास मोडण्याची । सर्व बंधने तोडण्याची ॥३॥
(स्वगत : या स्वातंत्र्य संपन्न अलंकाराची मागणी करताच शहाजी राजे गडबडले---ते म्हणाले----)
चाल : ४
क्षणि सुन्न शहाजी झाले, बोलते काय ही राणी
का वेड हिला लागावे ? का स्थिती अशी दीनवाणी
काय ही सखीची प्रीत । उलट ही रीत । मारते जीत ।
हीज कसे कुणी समजावे । ही असे पूर्ण तर ज्ञानी ॥१॥
चाल १
(हिन्द भूमिवर स्वातंत्र्य प्रस्थापित करण्यासाठी निसर्गाने अजून कुणी
शक्तिशाली पुरुष निर्माण केलाच नव्हता आणि त्यामुळे जिजाऊंच स्वप्न शहाजी
राजांकडून साकार होण्यासारखं नव्हतं. हे जिजाऊंनी जाणलं, आणि...)
घेउनी हाती तलवार । चमकती फार ।
जिजाऊ स्वार । होवूनी करु लागल्या संचार ॥
कराया दुष्टतेचा प्रतिकार । फुलविती युद्ध नीती अंगार ॥जी॥१॥
एकाग्र करुनिया मन । लाविती ध्यान ।
सोडती बाण । सामूहिक निष्ठा वाढण्याला ॥
कुलीन ललनाना रक्षिण्याला । क्रोध अन्याय मर्दिण्याला ॥हांजी॥२॥
रणचंडी सारखे रुप । पाहुनी पाप ।
भ्याले आपोआप ।:जिजाऊ म्हणती देश अमुचा ॥
धरा अभिमान थोर त्याचा । करावा पुकार स्वातंत्र्याचा ॥जी॥३॥
(स्वगत : जिजाऊ साहेबांनी युद्ध नीतीचे शिक्षण लहान वयातच जाणून घेतले.
पण त्यांना आता हवे होते मनुष्य बळ. त्यासाठी तुळजा भवानीला, अंबा
भगवतीला, काली मातेला आळवू लागल्या.)
ही पूर्ण तयारी झाली । परि बळ पाठीशी नाही
तूं धांवत अंबा बाई । संचार कराया येई
अंधार दाटला इथे । पुण्य घट रिते । जाहले जिथे ।
त्या इलाज अमुचा नाहीं । दे पाठींबा लवलाही ॥३॥
(जिजाऊंची प्रार्थना आत्मनिष्ठ होती. भगवतीने व्याकुळतेची प्रार्थना ऐकली
आणि कांही दिवसानंतर जिजाऊच्या पोटीं शिवनेरीवर हिंदवी स्थापण्यासाठीं राजे अवतरले त्यावेळीं)
धन्य तो किल्ला शिवनेरी । गजर एक करी । कल्पना खरी ।
सूर्य चमकला आज गगनात ॥ हास्य उमलले तसे भुवनात ।
सह्य हिमगिरी बोले कवनात जी ॥१॥
जागले गिरी डोंगर । देती ललकार ।
झाला अवतार । शिवाजी पुत्र थोर ठरला ॥
डाव मैदानी दुष्ट हरला । दया प्रेमाचा मार्ग धरला जी ॥२॥
भगवान बाळाजी । सुत । प्रथम भागात ।
आहे विनवीत । कृपा ही जिजामाउलीची ।
छत्रपती, संत, सज्जनांची । कल्पना महाराष्ट्र पथकाची ॥३॥

राजमाता जिजाऊ (पोवाडा) – शाहीर भगवान बाळाजी चव्हाण

धन्य धन्य जिजाऊ माता । त्यांची ही गीता ।
ऐकू जनहिता । विश्व प्रेमाची विमल मूर्ति ॥
मातृ देवता धन्य कीर्ती । पुण्यमय महाराष्ट्र धरती हां जी ॥१॥
पंधराशे अठ्ठण्णव साली । पौर्णिमा भली । पौषाची आली ।
जाधव घराण्यात धून घुमली ॥
’सिंदखेड राजा’ ग्रामी रमली । देव मंदिरे ही दुमदुमली हां जी ॥२॥
गगनास भिडे आनंद । ऐकू ये छंद । दिशाही धुंद । होवुनी गेल्या त्याच समयास ॥
शक्ति उतरली धर्म साह्यास । झाला संतोष सर्व हृदयास ॥जी॥३॥
(स्वगत : दिवसा मागून दिवस लोटले. जिजाऊ (राजकन्या) थोडया मोठया
झाल्या असतील आणि एक दिवस)
वेरुळकर मालोजी भोसले जहागीरदार
रंग पंचमी निमित्त आले जाणुनी परिवार ॥१॥सुपुत्र त्यांचे नाम शहाजी सोबत दिलदार
सहज समोरी तिथे पातली जिजाऊ सुकुमार ॥२॥
मालोजीना जाधव म्हणती बघा सून तुमची
रंग उधळुनी करते चेष्टा अपुल्या नवर्या ची ॥३॥
(आणि तोच शब्द नियतीने मालोजी राजांच्या पश्चात् खरा ठरवला.
जाधवराजांची कन्या महाराष्ट्राची राजमात होण्यासाठी बोहल्यावर चढली.)
नियतीने शब्द झेलला । खरा तो झाला ।
योगायोग आला । लग्न लागले मुहुर्तास ।
भूषण भोसले घराण्यास । पुणे प्रांतीय सूर्यवंशास ॥जी॥१॥
चालुनी सात पाऊले । भाग्य गृही आले । पुण्य उतरले ।
पाहुनी नवी सूनबाई ॥ कौतुक करती उमामाई । भेटली खरी अंबाबाई ॥२॥
घातला लग्न गोंधळ । उजळले स्थळ ।
गर्जे संबळ । स्वस्थता तरी मनी नव्हती ॥
प्रजाजन इथले हळहळती । दुष्ट येवुनी त्यांस पिडती ॥३॥
(स्वगत : असं काय घडलं होतं त्या वेळीं ?)
मंदिरे नष्ट ती झाली । व्याकुळता येथें आली ।
ना कोण कुणाचा वाली । आंदोळुन पृथ्वी गेली ।
पापी ते जाहले पुष्ट । देती ते कष्ट ।
संस्कृती नष्ट । ही जीर्ण अवस्था केली । तरु लता उन्मळून मेली ॥
चाल : १
त्या समई भयानक स्थिती । इतिहासा प्रति ।
वर्णिली इति । भूतळी कहर एक झाला ॥
सत्य सन्मार्ग तिथे हरला । पुण्य प्रेमाचा उदय विरला ॥१॥
उसळुनी क्रोध अंगात । राक्षसे घात ।
करती रस्त्यात । जगया नको जीवन करती ॥
भगिनी भ्रष्ट त्या कितीक मरती । प्रेत पाहुनी नयन भरती ॥२॥
येवुनी पूर्ण ही ग्लानी । झाली ती हानी ।डाली अवनी । काम मोहाचा आला संचार ॥
नियतीने केला होता अविचार । कळेना कुणा धर्म सुविचार ॥जी॥
(सत्य हा सर्वाचा एकच धर्म आहे याच मताच्या आऊ साहेबा होत्या. आणि म्हणून....)
आऊ साहेबा जिजा माउली खर्या् ’लोकमाता’
जन कल्याणा करीत होत्या हृदयातून चिन्ता ॥१॥
वाद तयांचा अखेर होता दुष्ट दुर्जनांसी (कारण) ?
कारण होत जगता यावे संत सज्जनांसी ॥२॥
(स्वगत : समृद्ध भारतावर परकीयांनी आक्रमण केलं,
प्रजेला लुटलं आणि त्यांची सेवा केली मात्र, आपल्याच लोकांनी.)
चाल : ४
इथे होते मराठी राजे गुलाम बनलेले । जी॥
संस्कृतीवान राष्ट्राचे तुकडे पडलेले । जी॥
शत्रूला मित्र ही होते फितूर झालेले । जी॥
स्वातंत्र्य सूर्य बुडविण्या नित्य टपलेले ॥जी॥
(स्वगत : या विकृतीच जिजाऊनी निरीक्षण केलं आणि ....)
पाहुनी ऐशी विकृती । सांगते सती ।
ऐका हो पती । अलंकार घडवा एक मजला ॥
करा स्वातंत्र्य हिन्द अबला । विनविते विनंतीने सुबला हा जी ॥१॥
ना तरी जीवन हे व्यर्थ । जळो हा स्वार्थ ।
ऐका परमार्थ । लोक हे करा संघटीत ॥
मारावी शत्रू संगे जीत । जन्म भूमिची ठेवा प्रीत ॥२॥
मी तुमची हृदय नायिका । खरी सेविका ।
गडबडू नका । प्रतिज्ञा हृदय जोडण्याची ॥
नाही कोणास मोडण्याची । सर्व बंधने तोडण्याची ॥३॥
(स्वगत : या स्वातंत्र्य संपन्न अलंकाराची मागणी करताच शहाजी राजे गडबडले---ते म्हणाले----)
चाल : ४
क्षणि सुन्न शहाजी झाले, बोलते काय ही राणी
का वेड हिला लागावे ? का स्थिती अशी दीनवाणी
काय ही सखीची प्रीत । उलट ही रीत । मारते जीत ।
हीज कसे कुणी समजावे । ही असे पूर्ण तर ज्ञानी ॥१॥
चाल १
(हिन्द भूमिवर स्वातंत्र्य प्रस्थापित करण्यासाठी निसर्गाने अजून कुणी
शक्तिशाली पुरुष निर्माण केलाच नव्हता आणि त्यामुळे जिजाऊंच स्वप्न शहाजी
राजांकडून साकार होण्यासारखं नव्हतं. हे जिजाऊंनी जाणलं, आणि...)
घेउनी हाती तलवार । चमकती फार ।
जिजाऊ स्वार । होवूनी करु लागल्या संचार ॥
कराया दुष्टतेचा प्रतिकार । फुलविती युद्ध नीती अंगार ॥जी॥१॥
एकाग्र करुनिया मन । लाविती ध्यान ।
सोडती बाण । सामूहिक निष्ठा वाढण्याला ॥
कुलीन ललनाना रक्षिण्याला । क्रोध अन्याय मर्दिण्याला ॥हांजी॥२॥
रणचंडी सारखे रुप । पाहुनी पाप ।
भ्याले आपोआप ।:जिजाऊ म्हणती देश अमुचा ॥
धरा अभिमान थोर त्याचा । करावा पुकार स्वातंत्र्याचा ॥जी॥३॥
(स्वगत : जिजाऊ साहेबांनी युद्ध नीतीचे शिक्षण लहान वयातच जाणून घेतले.
पण त्यांना आता हवे होते मनुष्य बळ. त्यासाठी तुळजा भवानीला, अंबा
भगवतीला, काली मातेला आळवू लागल्या.)
ही पूर्ण तयारी झाली । परि बळ पाठीशी नाही
तूं धांवत अंबा बाई । संचार कराया येई
अंधार दाटला इथे । पुण्य घट रिते । जाहले जिथे ।
त्या इलाज अमुचा नाहीं । दे पाठींबा लवलाही ॥३॥
(जिजाऊंची प्रार्थना आत्मनिष्ठ होती. भगवतीने व्याकुळतेची प्रार्थना ऐकली
आणि कांही दिवसानंतर जिजाऊच्या पोटीं शिवनेरीवर हिंदवी स्थापण्यासाठीं राजे अवतरले त्यावेळीं)
धन्य तो किल्ला शिवनेरी । गजर एक करी । कल्पना खरी ।
सूर्य चमकला आज गगनात ॥ हास्य उमलले तसे भुवनात ।
सह्य हिमगिरी बोले कवनात जी ॥१॥
जागले गिरी डोंगर । देती ललकार ।
झाला अवतार । शिवाजी पुत्र थोर ठरला ॥
डाव मैदानी दुष्ट हरला । दया प्रेमाचा मार्ग धरला जी ॥२॥
भगवान बाळाजी । सुत । प्रथम भागात ।
आहे विनवीत । कृपा ही जिजामाउलीची ।
छत्रपती, संत, सज्जनांची । कल्पना महाराष्ट्र पथकाची ॥३॥

नवा आवेश (पोवाडा) – शाहीर भगवान बाळाजी चव्हाण

आला नवा आदेश, बिजातुन स्फुरला नव अंकुर

महाराष्ट्र देवता वाजवी, मंजूळ सनई दूर ॥ध्रु०॥

स्वागत करती दाहि दिशा या, ओवाळून आरति शिवाला ओवाळून आरति

फितुरीचा तो खेळ हरविण्या संत थोर जागती आमचे संत थोर जागती

जिजा माउली पुण्य उधळती राष्ट्रातील घरभर ॥ध्रु०॥महाराष्ट्र ॥१॥

शौर्याचे रणशिंग फुंकुनी शूर दावितो बाणा अमुचा शूर दावितो बाणा

शत्रूसंगे झुंज खेळतो सवंगडयासह राणा शिवबा सवंगडया सह राणा भव तापाचे संकट हरले सुख चाले तूर तूर ॥ध्रु०॥महाराष्ट्र ॥२॥

गिरी शिखरातून नद्या वाहती भय सोडून खळखळ वाहती भय सोडून खळखळ

अभयाचे वरदान मिळाले उसळून आले बळ तयांचे उसळून आले बळ

नत मस्तक होवूंया शिवाच्या जाउन चरणावर ॥ध्रु०॥महाराष्ट्र ॥३॥

भिमा कोयना काठावरली क्षेत्रे ही जागली आमुची क्षेत्रे ही जागली

पंढरपुरच्या विठूरायाला शांत झोप लागली पहा हो शांत झोप लागली

वारकर्‍यांच्या कंठा मधुनी घोष घुमे हर हर ॥ध्रु०॥महाराष्ट्र ॥४॥