Thursday, August 13, 2009

वीररत्ना तानाजीराव मालुसरे (पोवाडा) - शाहीर पां.द.खाडिलकर

स्वातंत्र्यसंगरीं अर्पुनि शिरकमलाला, स्वातंत्र्यदेविच्या पदीं लीन जो झाला,

तो धन्य धन्य ! नरवीर कीर्तियुत होई, ईश्वर त्यावरि संतोषला ॥ध्रु०॥

चौक १

एके दिवशीं जिजाई पहाटेला । बोलत शिवाजीला ।

"कोंडाणा जंवा दिधला । यवनाला घाला तंवा पडला ।

राज्याला मोंगल काळ झाला । चित्ताचा धीर सकळ सुटला ॥

सारा मुलुख ताब्यांत ठेवण्याला । किल्ला पाहिजे झाला ।

स्वाधीन; आपणाला । ना तरी सदा काळिमा लागला ।

राज्याला तसाच कीर्तीला ॥ पाहिजे विचार हा केला ॥

रामकृष्ण तुमचे पूर्वज । जनक धर्मराज ।

धरावी त्यांची लाज । रावणाला धाक ज्यांचा पडला ।

कंसाला धाक ज्यांचा पडला; । पृथ्वीचा भार कमी हो केला ॥

ज्यांनीं धर्म सकळ बुडविला, । देश चिरडिला,

त्यांच्या नाशाला । घेतसे देव नविन अवतार;

दुष्टांचा पूर्ण करित संहार; । लक्षांत घ्यावा तोचि व्यवहार ॥

चाल

हें राज्यपद बहु कठीण पृथ्वीवरी ॥ ती भोगलालसा सदा जगीं वावरी ॥

षड्‌विकार होती बहु प्रबळ अंतरीं ॥ मग शुद्धबुद्ध होईल कावरीबावरी ॥

मग दृष्टि राहिल सदैव पापावरी" ॥ ऐकून आईचे बोल ।

शिवराज चित्तिं व्याकुळ, । म्हणे "माय । काय आम्हि केलं ?

कधिं पाप नाहीं बघितलं, । धर्मास नाहीं सोडलं ।

गर्वास उभं कापलं । आळसास नाहीं पद दिलं ।

मन तुमच्या अर्ध्या वचनांत सदा राहिलं" ॥

मग जिजामाउलिनं पुन्हां त्यास सांगितलं,

"जर किल्ला घेण्या ऊशिर । शिवराया ! लागला फार ।

तर हिंदुधर्माचं शिर । तर महाराष्ट्राचं शिर ।

मोंगल उडवि सरसर । धर्माचा होइल चूर । पापाचा वाहिल पूर" ।

डोळ्यांत अश्रु सांठले कंठ दाटला ॥ गहिंवरल्या कंठामधून शब्द उमटला ॥

"माघाच्या वद्य नवमीला । तो किल्ला पाहिजे सर झाला ।

करि पूर्ण आस ही बाळा " । शिवराज बोलले नमून मातृपदाला ॥

चाल

"जर पूर्व-पुण्याई केली । असेल लाभली ।

होइल शिव वाली । माउली । आज निश्च्य केला ।

माघाच्या वद्य नवमीला । जोडिन किल्ला मराठेशाहीला" ॥१॥

चौक २

उमराठं गांव छानदार । सुरेख घरदार ।

लावली तलवार । कमरेला, धाक यमाला पडला ।

पाताळीं काळ जाउन दडला । सौख्याला सदा मोहोर आला ॥

जसा जयंत शोभत इंद्राला । अभिमन्यु अर्जुनाला ।

स्कंद शंभूला । रायबा तसा तानाजीला ।

रायबा तसाच जनतेला । सौख्याला सदा बहर भरला ॥

शेलारमामा सांगत तानाजीला । "रायबा थोर झाला ।

आला हो लगिनाला । कराव औंदा लगिन ह्याचं ।

पाहुंद्या लगिन नातवाचं । चार इसावर हो वय आमुचं" ॥

तानाजिनं होकार तंवा दिला । सोयरा बघितला ।

मुहुर्त मग ठरला । माघाच्या वद्य नवमीचा ।

थाट लइ झाला तय्यारीचा । वर्णील कुठवर ही वाचा ॥

चाल

तंवा सम्द लोक जमुनशान बोलती तान्यास ॥

"लइ तान्या मोठा झालास शिवबाचा दास ॥

त्येचं थोरपण नावरुप सांगशि आम्हांस ॥

त्या शिवरायाच्या पायीं वाहिलं जीवास ॥

घरदार सोडून दिलं त्याच्या कार्यास ॥

त्यास आम्ही कधीं पाहावं ? । त्यास आपण कधीं देखावं ? ।डोळ्याचं पारणं फेडावं ? हा ताना शिवरायाच्या मर्जीतला

असं कौतुकानं सदानीदा सांगशि आम्हांला ॥

या वेळेस त्यास आणवावं । त्येनं आमचं गांव पहावं ।

त्येनं आपलं राहाणं देखावं । हें असं ध्येनांत धरावं ।

जा शेलारमामा ! तुम्ही तुम्ही त्यास आणावं" ॥

चाल

तानाजिनं इचार जरा केला । मामास सांगितला ।

रायबा संग घेतला । तिघेहि झाले घोडयावर स्वार ।

बाळ तरुण म्हातारपणाचा अवतार । जाहला जगांत जयजयकार ॥२॥

चौक ३

ऐका तंवाच राजगडावर । झालेला प्रकार ।

युद्धास घनघोर । आलं हो मूळ, प्रसंग थोर ।

ऐकावं शांत होऊन सारं । चित्ताचा सोडुं नव्हे धीर ॥

युगत करुन शिवाजी सुटुन गेला । दिल्लीहून आला ।

मराठया प्रांताला । होईल राग त्याचा अनिवार ।

करिल गट्ट मोंगल सरकार । दक्षिणेंत होईल मराठा कारभार

औरंगजेबानं विचार असा करुन । पन्नास हजार देऊन ।

शिपाई शिस्त करुन । धाडिला उदयभान सरदार ।

कोंडाणा किल्ल्याचा सम्दा अधिकार । शाहानं दिला तयास बहुकाळ ----॥

असा कागद घेऊन हेजिब आला । जयसिंगानं धाडियेला ।

त्याच समयाला । रायाच्या चैन मनाला पडेना ।

तान्ह्याच्या राया करित स्मरणा । नव्हते कां दुसरे सरदार नाना ?

चाल

हा विचार करिती शिवबा किल्ल्यावरी ॥ तों तानाजी पोंचले राजगडावरी ॥

ती अक्षत देण्या झाली त्यांची तय्यारी ॥ ती जिजामाउली त्यांची इचारपुस करी ॥

हें जाणून ताना चपापला अंतरीं ॥ हें असें कसं आज झालं ।

शिवरायानं नाहिं देखिलं । त्येच्या मनांत काय हो आलं ।

तें अजून नाहिं समजलं । लगिनास आलों आम्ही त्याला बोलावायला ॥

परि येत्या वेळेला सकून सुभ नाहिं झाला ॥ तर त्यास जाऊन भेटावं ।

त्येचं मन सम्द वोळखावं । शिवबानं सदा म्होरं यावं ।

आधि कडकडून भेटावं । मग आमचा हात धरुन किल्ल्यावर न्यावं ॥

परि असं कसं आज व्हावं । याचं कारण त्याला पूसावं ।

मग मामा ! लगिनामंदि एकमन व्हावं॥मग तडक तिघे निघाले । सरासर गेले ।

जेथे शिव बसले । युद्धाचा करित सकळ विचार ।

देशाचा होते करित संसार । आयास म्हणुन पडतोय फार ॥३॥

चौक ४

पाहुन तान्याला शिवाजि पुढं झाला । हातानं धरियेला ।

आणुन बसवीला । विचारी क्षेम तानाजीरावाला ।

मामाला आणिक रायबाला । येण्याचं तसं कारण त्याला ॥

चिंतेच्या अधीन पुरा । रायाचा चेहरा । तानाजीस दिसला ।

बोलला शूर मराठा सरदार । धैर्याचा मूर्तिमंत अवतार ।

प्राणाचा नाहिं तयास दरकार ॥ "तुमचं कुशल आधीं ऐकावं ।

मनानं आनंदावं । नंतर परिसावं । आमुचं; हाच उचित व्यवहार ।

राच्याचा दिला देवानं अधिकार । सांगावा आपला कुशल समाचार ॥

जसं प्रसन्न तुम्हां पाहिलं । पूर्वी मन धालं ।

नाहीं तसं देखिलं । भेटिच्या आजच्या समयाला ।

चंद्राला राहू चिंतेचा लागला । चित्तान असा कयास केला" ॥

शिवराज छत्रपति बोले । "विशेष नाहीं झालं ।

विचार सारं चुकलं । आपुलं, असे कुशळ आमचं ।

आतांच तानाजीराव येण्याचं । सांगावं काय कारण तुमचं " ॥

चाल

मालुसरे लागले बोलण्याला, आनंद जरा झाला,

तांदुळ पुढं केला, चित्ताचा हो बाग; परि गेला ।

घटकेंत वाळुनी सारा ! ॥ "शेलारमामानं सांगितलं आम्हांला,

रायबा थोर झाला, आला हो लगिनाला, सोयरा बघितला,

मुहूर्त मग ठरला, माघाच्या वद्य नवमीला ॥

सारे लोक बोलले आम्हांला, ’ऐशा समयाला,

शिवबा पाहिजे आला, आमच्या गांवाला भेट देण्याला,

होईल तोष डोळ्याला॥ सारीं कामं ठेवून बाजूला,

जिजाईमाईला, घेऊन गांवाला यावं लगिनाला,

तोष, दासाला । होईन, धन्य भूपाला" ।

खळबळे प्रेम चित्तांत, आनंद मिळत दुःखांत ॥

शिवराज बोलले तान्यास, ॥ "आमचं मन धांवे येण्यास,

चाल

पर शरीर दुसर्‍या कामावर । झालं तय्यार ।

घेऊन समशेर । कोंडाणा किल्ला कराया सर ।

माउलिनं घातली शपथ घोर । पुरवावी हीच आशा थोर" ॥४॥

चौक ५

माघाच्या वद्य नवमीला । किल्ला पाहिजे झाला ।

आपला जन्माला ! ना तरी गनिम खास बसला ।

काळिमा लागेल कीर्तीला । जन्मुन काय उपयोग केला

अशि शपथ घातली माउलिनं । प्राणहि अर्पुन ।

करिन स्वाधीन । कोंडाणा, जावें तुम्ही परतून ।

रायबाचं लग्न टाकावं उरकून । थाटानं यावं नंतर परतून ॥

या वेळेस स्वारिवर जावं । स्वताच अनुभवावं ।

युद्ध करावं । आशा ही झाली आम्हां अनिवार ।

हातांत घेतलि भवानी तलवार । आम्हां श्रीअंबाबाई आधार" ॥

हे शब्द हृदयिं झोंबले । मर्मिं लागले । ताना मग बोले ।

संचरे आर्यतेज हृदयांत । संचरे क्षात्रतेज अंगांत ।

उपमा नाहीं तिनहि लोकांत ! ॥ "आधीं लग्न लाविन कोंडाण्याचं ।

नंतर रायबाचं । हेंच ब्रिद आमुचं । वाहिला देह त्याच कार्यास ।

युद्ध मोक्षाचं दार आम्हांस ! । आपलं साह्य दीन दासास ॥

चाल

जरि आमच्यासारखं पडतिल लोक रणावर ॥ महाराज !

तरी मिळतील रोज भाराभर ॥ रंगेल लाल रक्तानं त्यांची समशेर ॥

आपण जर जाल बिनिवर । बरंवाईट झालं तर ।

मिळतील काय अवतार । दिसतात सूर्य कां फार ।

दिसतात तारे भरपूर । आमच्यासारख लोक घरोघर ।

तुमच्यासारख येक होणार । राहो लोभ तुमचा आम्हांवर ।

करो दया आज शंकर । सोडा हुकूम जाण्या रणावर ।

माघाच्या वद्य नवमीला किल्ला हो सर ॥

झालाच असं समजावं तरिच हा वीर ॥

ना तरी अंबेच्या पायीं वाहिन शीर !" ॥

चाल

अशि प्रतिज्ञा करुन निघाला । सुचेना अन्य त्याला ।

गात कवनाला । बंधुनो ! ऐका चरित्र त्याचं ।

शूराचं प्रतापि पुरुषाचं । पावन होईल मन आमुचं ! ॥५॥

चौक ६

लगिनाचा बेत रद्द केला ॥ घेऊन सूर्याजिला ।

टेहळणी करण्याला । चालला वेश करुन न्यारा ।

वळविलं रायाजी नाईकाला । ऐकावं त्येच्या पोवाडयाला ॥

घेरेसरनाईक रायाजी । मोठा रणगाजी । म्हणतो परी हां जी !

यवनाला, मोह मनाला पडला । मोंगलाचा दीन चाकुर बनला ।

मर्दाचा सम्दा इचार चुकला ॥ त्येच्या मुलीच्या लग्नामंदि गेला ।

तान्हा गोंधळाला । गात कीर्तीला । शिवबाच्या, झाला सारा लोक गार ।

चित्ताला त्यांच्या त्यानं केला वार । हातांत ओढली त्यांनीं तलवार ॥

रायाजी नाईक बोलला । तंवाच गोंधळ्याला । जाणलं त्येनं त्याला ।ज्याची हो खूण त्याला कळणार । चित्ताचा झाला त्याच्या निर्धार ।

यवनाचा आला त्यास तिटकार ॥

चाल

"अक्षि रावजी ! तानू गोंधळ्याला ।

वळखिलं सम्दं ! तुम्हाला ! गोंधळ्याचा पोशाख केला ।

अन् माझं मन पाहण्याला आला व्हय ? । केल आज पुनित देहाला ।दयेचा समिंदर झाला । काय हुकूम सांगावा मला ।

लइ दिसानं योग हा आला । आज जीव आमचा वाहिला शिवबादादाला ॥

देवलोक सम्द खाली आलं वाटतं आम्हाला ॥ राखाया गोरगरिबाला ।

राखाया गाय माउलीला । राखाया आपल्या धर्माला ।

धन्य धन्य तोड गावना तुमच्या कीर्तीला ! ॥"

तानाजी लागला बोलण्यला । "दावावा बुरुज आम्हाला ।

पाहुं द्या तट आम्हांला । रोखुं द्या जागा आम्हांला ।

जिथ्‌नं चढुनशान गांठावं उदयभानाला" ॥

चाल

घेरेसर रायाजि नाइकाला । घेऊन संगातीला ।

रोखुन बुरुजाला । परतले तानेराव सरदार ।

भवानी साह्य ज्यास करणार । वर्णन त्याचं कसं हो सरणार ॥६॥

चौक ७

तीन इसा मावळं संगातीला । घेऊन जाण्याला ।

सांगुनशान भावाला । चालला ताना कोंडाण्याला ।

पूजिलं शंभुभवानीला । घेतलं तीस आपल्या मदतीला ! ॥

निघतांना सांज लइ झाली । दौड परि केली ।

गांठली जाळी । राच्चं नौधाव्या घटकेला ।

काळोख सर्वामंदि भरला । घुबडांनीं गोंधळ लइ केला ॥

झुंजार बुरुज गांठला । येशीच्या शेंपटीला ।

लावुन सोलाला । बोलला तान्हा घोरपडीला ।

चित्ताला त्याच्या घोर पडला । पडलेला दूर तिनं हो केला ॥

यशवंती ! सदा यश दिलस । म्हणुन ठेवलं ।

नांव तुझं भलं । देइ ग आज बी तेंच मजला ।

पुरविन तुझ्या कौतुकाला । घालिन खायला ग्वाड तुजला !

असं म्हणुन सोडलं वर तिला । गेली सरसरा । आला पर फेरा ।

दैवाचा, बाई खालतं फिरली । पहिल्यांदा तिनं ही कच खाल्ली ।

असली ती गोष्ट कधिं न झाली ! ॥

चाल

मग तान्हा बोलला रागानं येशवंतिला ॥

"आज इचार काय ग तूं हा केलास ?

असा कधिं नाहीं बघितला । अपशकुन आज मला झाला ।

पर आमचा देह कधिं मागं नाहीं परतला ॥

आणि एकदां सोडतो वर तुला । ततं चिकाट धरुन धीराला ।

नाहिंतर उडविल तलवार तुझ्या ग मुंडक्याला" ॥

घोरपड धांवली सरसरा । वर बसली पाहुनी थारा ।

मग तान्हा झाला सामोरा । त्यानं घट्ट धरलं सोलाला ।

हिस्का मारुन् पाहिलं दोराला । सरसर चढाया लागला ।

जीवाची फिकीर नाहिं त्याला । चला या होबोलला लोकाला ।

झरझरा मावळा चालला ! वर भगवा झेंडा चालला ! ।

झट्‌कनं तान्हा झुंजार-बुरजावर गेला ! ॥

अक्षि वायसा सुद्धां गलबला । मावळ्यांनी बघावा नाहीं केला ।

तत मांसारक्ताचा काला । मावळ्यांनीं बघावा लई केला ।

असा धुमाकूळ माजला । तंवा कळल त्येंच्या लोकाला ।

खडबडून जागा मग झाला । मोंगलभाई बोलला ।

सैतान किल्ल्यावर आलाया कोणि राखा आम्हाला

चाल

आतां कोण कसला येणार । तुजला राखणार ।

ताना घेणार । नरडिचा घोट होउनि लाल ।

केल्या पापाच फळ भोगाल । आला या मर्तभूमिवर काळ ॥७॥

चौक ८

अशी कत्तल करुनि सरसरा । सांठवुनि शिरा ।

करुन मलमाला । आईच्या तान्हा लावि हृदयास ।

आला हो आला पूर शौर्यास । देखिलं त्यानं उदयभानास ॥

"हरहर महादेव" बोला । आला ऊत भला ।

खोर्‍यामदिं भरला । भानाला तान्हा सिंहापर खास ।

थरथरे काळ पाहुनी ज्यास । धांवला तो पारतंत्र्य चिरण्यास ॥

उदयभान वीर खळवळे । लाल झाले डोळे । तान्हा मग बोले ।

भानुला, देहभान नुरे त्यास । धर्माचा लागे त्याच्या मनीं ध्यास ।

भानुच्या उदयिं गुंतली आस ॥

चाल

"तूं उदयभान सरदार । रजपूत जातिचा वीर ।

तू हिंदुधर्मा आधार । तू हिंददेशा आधार ।

रामकृष्ण तुमचे पूर्वज होते नरवीर ॥

गायिवासरं पाळुनी कृष्ण झाला लइ थोर ॥

आज शिवानं घेतला अवतार । त्यास यश खास येणार ।

तू मातिमोल होणार । घरची बाईल ओढुन नेती ।

टकटका बघाया लावती । चरचरा गाय कांपिती ।

घटघटा रगात पिती । आमचं देव समदं फोडिती ।

धर्मास दुष्ट तुडविती । तोंडांत मांस घालती ।

साधुसंता त्रास लई देती । बायकाच्या अंगा झोंबती ।

त्यांची करणी सांगावी किती ? । अभिमान गेला शौर्याची झाली बघ माती ! ॥

चाल

तूं शूर मर्द सरकार । धर्मा आधार ।

जातिशीं वैर । साधुनी जाशि घोर नर्कांत ।

येउं दे आंर्यतेज अंगांत । होईल कीर्ती तिनही लोकांत ॥८॥

चौक ९

उपदेश गेला परि वाया । सत्तेची माया ।

सूडाची छाया । पसरली उदयभानावर खास ।

मोगलाचा धरला त्यानं विश्वास । जोरानं धांवला वार करण्यास ॥

तानाजी सिंह खवळला । धावुन गेला ।

पट्टा लइ फिरला । युद्धाला आला रंग अनिवार ।

बिजलिची करणी करित तलवार । दोघेही होते मोठे लढणार ॥

दैवाची करणी परि न्यारी । फिरला माघारी ।

देव कंसारी । भानानं केला तान्यावर वार ।

डाव्या हाताला रक्ताची धार । लागली; पडली भूमिवर ढाल ॥

गुंडाळून हाताला मुंडासा । झाला कसाबसा ।

सज्ज, परि फांसा । दैवानं घातला, कोण काढणार ?

दैवाला दया न कधिं येणार । भाळीं जें लिवलं तसंच घडणार ! ॥

तो धैर्यमेरु उमळला । धरणीला आला ।

झाला जीव गोळा । सोडुन देह गेला स्वर्गास ।

भानानं हाणली लाथ डोक्यास; । पापाची भरली त्याच्या घडी खास ॥

चाल

इतक्यांत टोळी घेऊन सूर्या वर आला ॥ त्येनं पाहिलं पळत्या लोकाला ।

त्येनं पाहिलं पळत्या मावळ्याला । "कुठं जाता ?" बोलला तो त्याला ।

सूर्याला मावळा बोलला । अहो ताना पडला धरणीला मोठा घात झाला

डोळ्यांत अश्रु दाटला । पर मोठा धीराचा तो पडला ।

तलवार रोंखुन बोलला पळत्या लोकांला ॥ "अर भित्र्या लोकांनो ?

जरा । ईचार मनामंदी करा ! । अर लढुनशान तरि मरा ।

इथनं पळुनशान जाऊन अमर काय झाला ?

जो भ्याड पळपुटा झाला । तो खास गेला नर्काला ।

ठेवावं खालतं भाल्याला । नेसावं चोळीलुगडयाला ।

कमरेच्या सोडून शेल्याला । नेसावं बायकी शालुला ।

डोक्याला लावुन कुंकवाला । हातात भरुन बांगडीला ।

मग पळुनशान जाऊन राखा जीवाला ॥ काय आल्या धरुन दोराला ।

जाणार सांगाव मला ? । तो दोर तुमच्या आधींच झुंजुन मेला ! ॥

लइ जपुनशान जीवाला । कायमचं काय राहिला ।

इथनं जाउन्‌शान गांवाला । सांगाल काय राजाला ?

हर हर महादेवबोला । चला घुसूनशान् उडवुया लाख मुंडक्याला" ॥

चाल

धन्य ! धन्य ! सूर्याजीराव ! उतराई व्हावं ।

कशानं सांगावं । भावाचं दुःख लोटुनी पार ।

देण्याला जीव झाला तय्यार । घेऊन याल कधीं हो अवतार ! ॥९॥

चौक १०

पुन्हां सारा उलटला भाला । मावळा एक झाला ।

केला मग हल्ला । मोंगलाची झाली तारपिट फार ।

पळती हो खाल्ला त्यांनीं लइ मार । घेण्याला लावली त्यांना माघार ॥

मामाची झुंज लागली । भानाशीं भली ।घालुन खालीं । भानुला धाडलं घोर नर्कांत ।

फडफडे भगवा झेंडा किल्ल्यांत । प्रसिद्ध झाला तिनहि लोकांत ॥

वृत्तांत सारा घडलेला । कळला राजाला ।

लागली डोळ्यांला । पाण्याची धार, गेला आधार ।

शिवबाला तान्हा प्राणापर प्यार । दुःखाचा झाला त्यास लइ भार ॥

हुंदक्यानं आला उमाळा, । शिवबा बोलला ।

"हाय ! घात झाला । ठेवुन पृथ्वीवरती आम्हांस ।

सोडुन गेला । तान्हा स्वर्गास ! । दैवाला नाहिं दया लव खास ॥

चाल

स्वातंत्र्यदेविच्या गळ्यामधुन मणि गळला ॥

काय एकदांच सद्भाग्यचंद्र मावळला ॥

तो देशभक्तिचा सिंधु कोरडा पडला ! ॥

माणीक एक हरपला ! । स्वातंत्र्यहंस तो मेला ।

ताब्यांत आला गड परी सिंह तो गेला ! ॥

पांडुरंग शाहीर गातो त्याच्या कवनाला ॥१०॥

ठकास महाठक (पोवाडा) - शाहीर पां.द.खाडिलकर

महाठक ठका भेटला । अजब युक्तीला ।
योजून पार झाला । शेराला सव्वाशेर शिवराय ।
दिल्लिपति सदा करित हाय ! हाय ! ! ।
पोवाडा पांडुरंग कवि गाय ॥ध्रु०॥
चौक १
जंवा पुरंदरचा तह झाला । शाहा खुष झाला ।
जयसिंगाला । शिवाजीनं मदत केली हो फार ।
आदिलशाही त्यानं केली बेजार । शौर्याची शर्थ केली अनिवार ॥
शाहानं लिहिलं शिवाजीला, । "तुमच्या शौर्याला । तुमच्या कीर्तीला ।
तोड नसे, फिदा झालों मी फार ! । यावं भेटिला, करिन दरबार ।
करिन बहुमान तुमचा मी फार ! ॥ मनिं शंका मुळीं नच धरा ।
माझ्या या घरा । विचार ठाम करा । येण्याचा, तोष होईल चित्तास ।
एकमेकांचा जडेल विश्वास । एकदां आम्हांकडं यावं तुम्ही खास" ॥
विश्वासु मित्र जमविले । किल्ल्यावर भले । राजा मग बोले ।
"गडयांनों ! शहा बोलवी आम्हांस । सल्ला काय तुमचा असल्या समयास ।
धरावा कसा त्याचा विश्वार ? ॥ तरी जावं वाटतंय् मला । भेट देण्याला ।
हिंदुराज्याला । चार शाह्या झोंबती आजच्या समयास ।
कांहीं काळ वश करणं एकास । खास जरुरीचं वाटतं आम्हांस" ॥
सर्वांनीं विचार जरा केला । अभिप्राय दिला । अनुकूल त्याला ।
राजा मग बोलला फिरुन सर्वांस । "शाहाचा मुळीं नसे विश्वास ।
केव्हां दगा होईल कळे ना कोणास " ! ॥
चाल
म्हणुन मोरोपंत पेशवे पंडित; । अण्णाजी दत्तो सुरणीस; ।
निळो सोनदेव मदतीस । तीघांच्या हातीं सोंपविली सत्ता ते वेळा ॥
किल्ल्यांची पाहणी शिवराय करुन हो आला ॥
राज्याचा बंदोबस्त केला । अन् कोण कोण घेतले मदतीला ।
दादांनो ! सांगतों तुम्हाला ॥
चाल
निराजी आवजी न्यायाधीश । बाळाजी आबजी चिटणीस ॥
त्रिंबक सोनदेव डबीर । आणि प्रतापराव गुजर ॥
जीवनराव माणकोजी खास । नरहरपंत सबनीस ॥
राघो मित्र घेतले मदतीस । दत्ताजी त्रिंबक हि खास ॥
हिरोजी फर्जंद वीरास । राजानं घेतलं मदतीस ॥
कित्येक असले सरदार घेतले मदतीला ॥
संभाजी राजपुत्राला । त्येनं संग घेतलं ते वेळा ।
पांच हजार घेतलं फौजेला । भवानीच्या केले स्मरणाला ।
आठवलं रामदासाला । जिजाईला भेटून आला ।
आणि राजा चालला आगर्यााला ॥ दोन महिने लागले जाण्याला ।
शिवाजिला खास राहण्याला ॥ शिवपुरा तयार होता केला ।
ततं राजा जाऊन उतरला । रामसिंग दिला दिमतीला ।
असा राजा थाटमाटानं गेला आगर्यादला ॥
चाल
पुढं काय प्रकार झाला । पुढच्या चौकाला ।
सांगिन तुम्हांला । कथानक गोड मोठं छानदार ।
शिवाजी सांबाचाच अवतार । असा कधिं हिरा पुन्हा होणार ? ॥१॥
चौक २
दरबार शाहानं भरविला । दुसर्याम दिवसाला ।
थाट लइ केला । वाटे जणु ’मयसभा’ ही छान !
कराया शिवाजीचा अपमान । बादशाहा झाला होता बेभान ! ॥
तंवा जमले सारे सरदार । मोठे सुभेदार । शाहीचे नोकर ।
जमले पाहण्याला शिवाजीला । दरबारीं जो तो खडा झाला ।
मनाप्रमाणंच ते वेळा ॥ पच्चिस हात मारतोय उडी ।
शिवाजी गडी । वाघाला फाडी । असला हा वीर कसला झाला ! ।
पाहावं एकदां तरी त्याला । जो तो करि असल्या विचाराला ! ॥
शिवाजीनं पोशाख छान केला । तरवार कमरेला ।
चालला दरबाराला । ज्याचा त्याचा डोळा खिळुन गेला ।
वाटे जणुं मदनाचाच पुतळा । अमीर उमराव थक्क झाला !! ॥
चाल
शिवाजीनं लवुन शाहाला मुजरा तंवा केला ॥
पंधराशें होनांचा वरती नजराणा दिला ॥
सहा हजार मोहरा देऊन बहुमान केला ॥
असा बहाणा राजनिष्ठेचा ठाकठीक केला ! ॥
असा विधि झाल्यावर शहा बोलला शिवबाला ॥
"राजनिष्ठा तुमची पाहुन शाहा खुष झाला ! ॥
जसवंतसिंगराजाच्या खालच्या बाजूला ॥
जा, उभे रहा, तो मान तुम्हांला दिला !" ॥
असं बोलला शहा शिवबाला । शिवाजीचा अपमान झाला ! ।क्रोधाग्नि आंत भडकला ! । जसा सूर्य बारा डोळ्यानं, तसा चमकला ! ॥
जसा वणवा रानाला,तसा राजा भडकला ! ॥
जसा जलधि खवळावा, तसा राजा खवळला ! ॥
तंवा शिवबा बोलूं लागला । अपमान माझा करण्याला । काय इथं आणलं तुम्ही मला ? ।
जो करार जयसिंगराजानं माझ्याशीं केला । तो आज तुम्ही मोडला ! ।
बस्स ! पुरे ! जातों माघारा " । असं बोलला राजा ते वेळा ! ।
सरदार सुभेदार जिरले जागच्या जागेला ! ॥ जणु महारुद्र खवळला ।
शाहानं दरबारच जल्दी बरखास्त केला !! ॥२॥
चौक ३
शिवाजीचा बाणा पाहून । दरबारी खान । गेले हादरुन ।
शहाही झाला थक्क ते वेळा ! । सर्वांची मति कुंठित ।
धाक पोटांत । एक चित्तांत । शिवाजी हो दिसला ! ॥
जंवा शहा विचारमूढ झाला । सुचेना कांहीं त्याला ।
सल्ला देण्याला । आली तंवा त्याची मामी जोरानं ।
नवर्यादचीं बोटं कापली । म्हणुन भडकली ।
बोलाया आली । मामी आणि सून ! ॥
"अवरंग ! ऐक सल्ल्याला ॥ शिव्या आयता हातीं गवसला ।
कैद कर त्याला । कांटा हा झाला । उपटून काढला पाहिजे या वेळा ।
ही संधी आली चालून । जर म्हणसी आतां तूं न न । शिरजोर पुढं होऊन ।
सूडाची ज्योत घेऊन । करिल हैराण । पादशाहीला ! ॥
मामीचा सल्ला हा पटला बादशहाला । शहानं कैद केलं त्याला ।
शिवपुर्या्मधींच शिवाला । कोंडून ठेवलं ते वेळा ।
पिंजर्यां्त कोंडलं सिंहाला । कडेकोट पहारा वाडयाला ।
पोलादखान मुख्य नेमला । पांच हजार शिपाई मदतीला ।
जो राजा भेटीला आला । शाहानं कैद केलं त्याला ! ।विश्वासघात करुनि हो शिवा पकडला !! ॥
शिवाजीला पूर्वी धरण्याला । बडाबडा खान पाठवला ।
पण ज्यानं थांग नाहिं दिला । तो आज कपटजाळ्यांत सिंह सांपडला ! ॥
चाल
दख्खनचा सिंह कैद झाला । आपदा हिंदुराज्याला ॥
बीं नुकतं रुजलं भूमीला । पर भुंगा लागला त्याला ! ॥
स्वातंत्र्यसूर्य उदयाला । पर केतु ग्रस्त करि त्याला ! ॥
या दुष्ट बातमीचा गोळा । दख्खनला जाळत आला ! ॥
जणुं आला वज्राचा घाला ! । काळ मोठा दारुण आला ॥
चाल
काय युक्ति शिवबा योजील । कसा निसटेल ।
सांगे शाहीर । दादानों ! गोष्ट घ्यावी चित्तांत ।
शिवाजीनं केली शहावर मात । कशी ती ऐका पुढच्या चौकांत ॥३॥
चौक ४
जगदंबा गेली सप्नाला । बोलली शिवबाला ।
"भिंऊ नको बाळा ! निरशीन तुझ्या संकटाला" ।
शिवाजीला तोष फार झाला । उपाय एक सुचलां खासा त्याला ॥
आजार्यााचा बहाणा त्यानं केला । अंथरुणाला खिळला ।
निरोप शाहाला । धाडला त्यानं एक त्याच वेळेला ॥
"लोक माझा हैराण झाला । हवापाणी मानवेना त्याला ।
जाण्याला दख्खन देशाला । आतुर फार झाला । निरोप द्या त्याला ॥
चाल
शाहानं विचार मनिं केला । ’देऊं निरोपाला ।
सार्या फौजेला । शिवाजिच्या, जाऊ द्या दख्खन देशाला ।
मग शिवा एकटा राहील । भय त्याचं कमी होईल ।
मग तोच झुरुन जाईल । मरण पाहील । खास आग्या िर ला" ।
लोक सारा पाठवुन दिला । दख्खन देशाला; । थोडा पण ठेवला ।
ठायीं ठायीं गावामध्नं ते वेळा ॥ ते आपला वेष पालटून ।
गावात्नंय राहिले जाऊन । शिवाजीला जाती भेटून ।
नित्य येऊन, । रोजचा नेम झाला ॥ बरं वाटतं आतां जीवाला ।
म्हणून मिठाई तो वाटतो गांवाला । पेटारे जाती भरुन ते वेळा ।
शिवपुर्यांातून रोज किती । नाहीं गणती ।
अचाट हि युक्ति । सुचली शिवबाला ! ॥
चाल
रोज पहारेवाले नेमानं ॥ पेटारे बघती उघडून ॥
आरंभी रोज उघडून । पाहती नित्य नेमानं ॥
पर कंटाळले रोज पाहून । पुढं पुढं पाहतीना कोण ! ॥
ठकालागीं ठक होऊन । शिवाजीनं केलं वर्तन ! ॥
चाल
रोज असा नेम चालला । विश्वास वाटला सर्वांला ।
एके दिशीं शिवानं कळविलं आपल्या लोकांला ॥
"की व्हा तय्यार अमक्या जागेला । आज आज रात्रीं नेमक्या वेळेला" ।
जंवा सूर्य चालला अस्ताला । तंवा त्यानं सोडलं पलंगाला ।
हिरोजी फर्जंद वीराला । त्यानं पलंगावरती निजवला ।
पांघरली शाल अंगाला । शिवाजीची आंगठी हिरोजीनं घातली ते वेळा ॥
अन् हात बाहेर (उघडा) ठेवला । शिवाजीच्या गादीवर हिरोजी हो पहुडला ! ॥
एक मुलगा मदारी मेहेतर चेपतो पायाला । असा सारा देखावा केला ।
अन् शिवाजी पेटार्यां त बसला । संभाजी जवळ घेतला ।
अन् पहार्यापत्नंि बाहेर चालला ! । शिवा गेला ! गेला ! निसटला !! ।
आणि बघतां बघतां शिवराजा नाहिंसा झाला ! ॥४॥
चौक ५
दुसरे दिवशीं पोलादखान आला । पहारा करण्याला ।
थक्क पार झाला ! । गलबला रोजचा दिसेना त्याला ।
सामसूम वाडा शांत दिसला । पक्षी कोंडलेला उडून गेला ! ॥
लगबगीनं शहाकडं गेला । बोलला शाहाला ।
"हुजूर ! घात झाला! । पिंजरा आज रिकामाच पडला ।
शिवा फसवून निघुन गेला ! । गेला कसा ठाव न कोणाला ! ॥
चोवीस तास पहार खडा केला । तरि ही पार झाला ! ।
कळेना कसा गेला ! । काय जमिनीच्या आंत शिरला ।
अस्मानांत काय उडुन गेला । भूत चेटूक साहाय्य त्याला ! ॥
पचीस हात मारतोय उडी । ऐकलं घडोघडी । म्हणुन मोठे गडी ।
ठेवले होते पहार्याीवरती मी खास । फसवून गेला कसा सकळास ।
समजेना गूढ पडलं आम्हांस ! ॥ दांत ओंठ चावले शाहानं ।
मुठी वळून । बोलला रागानं । "गेला कसा ? कुठं हराम सैतान ।
काय करुं !" ----- बोलला दाढी हालवून । गेलं कंबरडं त्याचं वांकून ! ॥
चाल
मग धाडली फौज शाहानं चारी दिशेला ||
’जिथं शिवा दिसेल तिथं पकडा’----हुकुम असा केला ॥
किती स्वार गेले शोधायला चारी बाजूला ॥पण शिवा सांपडेना त्याला । दाढी मिशा काढल्या ते वेळा ।
वेष बैराग्याचा हो केला । अन् चालला राजा मथुरेला ।
अज्ञातवास हा भला । काय धर्मराज प्रगटला ! ।
नलराम पांडवादींना जोड जाहला ! ॥ असो !
आतां ऐका गोष्टीला । मथुरेला राजा हो गेला ।
संभाजी संगें घेतला । कृष्णाजी विसाजी काशिराव मथुरेला ॥
होते, त्यांच्या जवळ संभाजी बाळ ठेवियला ॥
शिवराय गेला मग पुढं काशियात्रेला ॥
हळुहळु राजा मग आला दख्खन देशाला ॥
मग गेला राजगडाला । बालेकिल्ल्याजवळ जरि गेला ।
तरि वळखेना कोणी राजाला ॥ शिपायानं रोखलं राजाला ! ।
आणि आंत निरोप धाडला । कीं "बैरागी एक वर आला ।
अन् भेटायची इच्छा तुम्हांला" । मोरोपंत आले दाराला ।
जिजा माउली आली दाराला । पण वळखेना आई बाळाला ! ।
शिवबानं धरलं पायाला । जंवा हात लागला पायाला ।
तंवा वळखिलं तिनं मग त्याला ! । प्रेमाचा ओघ सुरु झाला ।
अन् शिवाजीच्या हातांतून तिच्या पायामधिं शिरला ॥
पोटाशीं धरलं बाळाला । प्रेमानं डोळा भरुन आला । आनंदीआनंद झाला ॥
चाल
किती तोफा झडल्या ते वेळां । चहुंकडे बातमी देण्याला ।
किती दानधर्म हो केला । आणि पुजा बांधली देवीला ॥
असा कांहीं काळ मग गेला । संभाजी दक्षिणेंत आला ॥
चाल
उघडलं शब्दभांडार । शारदेचा वर ।
तरि न भरपूर । शिवाजिचं यश वर्णाया खास ।
’नेति ! नेति’ ! मौन पडलं सकळांस ।
शाहीर पांडुरंग शिवदास ॥५॥
चाल
मग धाडली फौज शाहानं चारी दिशेला ||
’जिथं शिवा दिसेल तिथं पकडा’----हुकुम असा केला ॥
किती स्वार गेले शोधायला चारी बाजूला ॥पण शिवा सांपडेना त्याला । दाढी मिशा काढल्या ते वेळा ।
वेष बैराग्याचा हो केला । अन् चालला राजा मथुरेला ।
अज्ञातवास हा भला । काय धर्मराज प्रगटला ! ।
नलराम पांडवादींना जोड जाहला ! ॥ असो !
आतां ऐका गोष्टीला । मथुरेला राजा हो गेला ।
संभाजी संगें घेतला । कृष्णाजी विसाजी काशिराव मथुरेला ॥
होते, त्यांच्या जवळ संभाजी बाळ ठेवियला ॥
शिवराय गेला मग पुढं काशियात्रेला ॥
हळुहळु राजा मग आला दख्खन देशाला ॥
मग गेला राजगडाला । बालेकिल्ल्याजवळ जरि गेला ।
तरि वळखेना कोणी राजाला ॥ शिपायानं रोखलं राजाला ! ।
आणि आंत निरोप धाडला । कीं "बैरागी एक वर आला ।
अन् भेटायची इच्छा तुम्हांला" । मोरोपंत आले दाराला ।
जिजा माउली आली दाराला । पण वळखेना आई बाळाला ! ।
शिवबानं धरलं पायाला । जंवा हात लागला पायाला ।
तंवा वळखिलं तिनं मग त्याला ! । प्रेमाचा ओघ सुरु झाला ।
अन् शिवाजीच्या हातांतून तिच्या पायामधिं शिरला ॥
पोटाशीं धरलं बाळाला । प्रेमानं डोळा भरुन आला । आनंदीआनंद झाला ॥
चाल
किती तोफा झडल्या ते वेळां । चहुंकडे बातमी देण्याला ।
किती दानधर्म हो केला । आणि पुजा बांधली देवीला ॥
असा कांहीं काळ मग गेला । संभाजी दक्षिणेंत आला ॥
चाल
उघडलं शब्दभांडार । शारदेचा वर ।
तरि न भरपूर । शिवाजिचं यश वर्णाया खास ।
’नेति ! नेति’ ! मौन पडलं सकळांस ।
शाहीर पांडुरंग शिवदास ॥५॥

शाहिस्तेखानाचा पराभव (पोवाडा) - शाहीर पां.द.खाडिलकर

नाश कराया शिवरायाचा आला शाहिस्ताखान ॥

छाटुन बोटें दूर पळविला; । धन्य शिवाजी भूरमण ! ॥ध्रु०॥

चौक १

केला धुमाकूळ शिवरायानं संकट मोंगल-राज्याला ।

स्वातंत्र्याच्या मुळ्या भेदिती अभेद्य मोंगल-भिंतीला ! ॥

चिरे धडाधड पडूं लागले, बुरुज कोसळे धरणीला ! ।

शिवशक्तीच्या तोफेमधुनी सुटला भीषणसा गोळा ! ॥

शिवतेजाची वीज देतसे झटके औरंगजेबाला ! ।

कांहीं सुचेना, अन्न रुचेना, झोपहि ये ना नयनाला ! ॥

भगवा झेंडा फडफड फडके भूषण वार्‍याला झाला ।

फडफड करुनी गगनी बोले, ’धन्य शिवाजी अवतरला !

दर्‍याखोर्‍यांतुन मैदानांतुन पाउल टाकी शिव जेव्हां ।

विजयश्रीचीं फुलें उमलती त्या त्या स्थानीं मग तेव्हां ॥

फिरंग फिरवी शिवबा इकडे, तिकडे मोंगल गडबडला ! ।

टाप घोडिची ऐकुनि तिकडे शाहा कासाविस झाला !! ॥

दर्प असा हा शिवशक्तीचा सहन होइना दिल्लीला ।

रात्र्म्दिन नच झोप कुणाला, काय करावें शिवबाला ! ॥

विचार ठरला, दूत निघाला आला दख्खन देशाला ।

बादशाहाचं पत्र दिलं मग त्यानं शाहिस्ताखानाला ! ॥

"चला, मरा, तुम्हि कांहि करा, पण धराच या शिवचोराला ।

सरा न मागें, घरा न जावें, चराचरा शिवचोर चिरा !" ॥

बादशहाचं पत्र असं हे वाचुन शास्ताखान जरा ।

मनीं चरकला, विषण्ण झाला क्षणिं कोमेजुन ही गेला ! ॥

शुभ्र लोंबत्या दाढीवरचा रंग लगोलग पालटला ! ।

हात मस्तकावरती ठेवुन करि तो घोर विचाराला ॥

"काम असे हें अवघड मोठें शिवा न सोपा धरण्याला ।

पिशाच्च चेटुक अनुकुल त्याला कसें धरुं सैतानाला !!" ॥

स्वारीचा पण निश्चय केला शूर शिपाई जमवीला ।

फौज घेउनी खान चालला शिवरायाला धरण्याला ॥

जातां जातां बेत ठरवला चाकण किल्ला घेण्याला ।

वेढा दिधला मग खानानं सत्वर, चाकण किल्ल्याला ॥

प्रकार पुढचा काय जाहला सांगिन पुढच्या चौकाला ।

धन्य शिवाजी रसिकजनांनो ! ऐका श्रीशिवकीर्तीला ॥१॥

चौक २

नरसाळा फिरंगोजी वर । होता किल्लेदार ।

मोठा बाणेदार । झाला तय्यार संग्रामाला ।

केले घनघोर लढाईला । अस्मानांत धुरळा सारा भरला ! ॥

आटोकाट झगडा त्यानं केला । किल्ला लढविला ।

उपाय पर थकला । खानानं केलं कैद त्याला ।

किल्ला खानाच्या हातीं गेला । नरसाळा धन्य धन्य झाला ! ॥

चाल

शाहिस्ताखान मग त्याला । काय बोलला सांगतों तुम्हांला ।

"र्‍हा आतां आमच्या चाकरीला । चढवीन मोठया हुद्याला ।

शिवा काय देणार तुला ? । शिवाजीचा नाश करण्याला खान हा आला ॥

शिवाजीचा नाश खास झाला । असं समज आज या वेळा ॥

कोल्ह्यानं सिंहाशीं झगडा कधीं काय केला ?

शिवा चोर बंडखोर झाला । चल माझ्यासंग या वेळा ।

पकडुया बंडखोराला !!" । असं बोलला खान हो त्याला ।

फिरंगोजी लालेलाल झाला ! । फिरंगोजी बोलला खानाला ॥

चाल

"शिवाजीचा बंदा नोकर । नरसाळा अस्सा राहणार ! ॥

शिवाजीच्या पायावर शीर । ठेविन मी, तोच मज प्यार ॥

शिवराय माझा रे मोर । शिवराय चंद्राची कोर ॥

चाल

बडबडसी व्यर्थ या वेळा । जंवा पाहशी खाना !

तूं त्याला । तंवा दरदरेल घाम अंगाला ।

दांतखिळी बसेल तोंडाला । शिवराय सिंह रे झाला ।

लोळविले कैक भूमिला । करुं नको त्याच्या निंदेला ।

जाऊं नको त्याच्या वाटेला । माझ्यासारखे कैक रे वीर त्याच्या पदराला ॥

परतून जा जा माघारा । अन् सांग बादशाहाला ।

कीं शिवाजीला कैद करण्याला । गेलों होतों---आलो माघारा ! ।

जो करील कैद शिवाजीला । असा एवढा सार्‍या दुनियेंत कोण हि न झाला !!" ॥

चाल

ऐकुनी बोल वीराचे । खान मनीं गारेगार झाला !

पाहून स्वामिभक्तीला । खानाला संतोष झाला ! ।

खानानं सोडलं मग त्याला । अन् त्याचा मोठा गौरव केला ॥

चाल

शिवरायाकडं पाठवलं त्यानं मग त्याला ॥

चाल

चाकणचा किल्ला घेऊन । चालला जल्दीनं ।

मोठया ऐटीनं । पुण्यामंदि थेट खान आला ।

शिवाजीचा वाडा त्यानं घेतला । ऐका प्रकार काय झाला ॥२॥

चौक ३

शिवाजीच्या महालामधिं खान । राहिला येऊन ।

बंदोबस्तानं । जागजागीं ठेवलं शिपायाला ।

हुकुम मनाईचा हत्त्याराला । वेशीवर पहारा रोज बसला ! ॥

खानाच्या परवान्यावीन । फिरकेना कोण ।

पाखरुंहि लहान । एवढा त्यानं बंदोबस्त केला ।

धाक शिवाजीचा वाटे त्याला । रात्रींही झोंप न डोळ्यांला ! ॥

सिंहाच्या गुहेमधिं जसा । ससा कसाबसा ।

शिरावा तसा । शिरला पुण्यामंदि खान ते वेळा ।

मगराच्या दाढेला हात । हात लावला त्यानं निभ्रांत ।

निभ्रांत जाहला भ्रांत । झाला काय वात ।

कळेना मजला ! ॥ शिवराय होता सिंहगडीं ।

घेउन सवंगडी । विचार घडोघडी । घडविती किल्ल्यावरती ते वेळा ॥

शाहिस्ता आला चालून । पुण्यामंदि राहिला येऊन ।

काढावा कसा हुसकून । विचार जोरानं असला हा झाला ॥

पाठवला एक ब्राह्मण । शिवरायाने । पुण्यामंदि त्यानं ।

जाऊन वश केलं एका मराठयाला ॥ एक खोटया लग्नाचा घाट ।

घाट घातला बीनबोभाट । वरातीचा रात्रीला थाट ।

कैला ऐटींत । लोक किति जमला ! ॥

चाल

घाट कात्रजचा जवळ झाला । तीन कोसाच्या अंतराला ।

शक्कल सुचली शिवाजीला । खानाची फौज चकविण्याला ।

पोत बांधवले हो झुडपाला ! । कात्रज घाटांत ते वेळा ।

पोत बैलांच्या हो शिंगाला ! । बांधले खानाला ठकविण्याला ।

झुडपं झालीं साहाय्य शिवाजीला । पशुपक्षी झाले साहाय्य त्याला ।

दुसरा जणु रामचंद्र आला ! । नंदी झाले साहाय्य शंकराला ! ।

गाऊं किती त्याच्या पोवाडयाला ? । इकडं असा त्यानं बेत केला ।

अन्‌ एका बोलावलं मावळ्याला । गवताचा भारा दिला त्याला ।

भार्‍यामंदि घातलं तलवारीला ! । मावळा पुण्यामंदि घेउन गेला ।

तंवा शिवाजीनं । दहा वीस जण । मावळे घेऊन ।

वेष पालटून । सोडला गड, पुण्यामंदि आला ।

काळोख काळा कुट्ट भरला । वरात आली होती गणपतीला ।

गर्दिमंदि शिवराय हो शिरला । ऐकावं र दादा ॥३॥

चौक ४

लाल महालामधीं येऊन राहिला जरि खान । तरि हालचाल होईना शत्रुपासून ।

खानाला वाटलं शिवराय गेला घाबरुन । बंदोबस्त मोठा पाहून ।

खानाचं मन । होतं प्रसन्न ॥ चहुकडं सामासूम झाली ।माणसं झोंपली । गाढ झोंप आली । खानाला, नव्हतं त्याला देहभान ।

भररात्रीं खिडकी उघडून । शिवराय आणि चार जण । गेले घुसून ! ॥

खानाचा मुलगा ठार केला । झाला गलबला । खान जागा झाला !

पाहतो तों दिसला काय प्रकार । शिवाजी झाला छातीवर स्वार ।

तय्यार झाला कराया वार ॥ बायकांनीं दुःखी होऊन ।

अति गहिवरुन । हात जोदून । विनवणी केली शिवाजीला ।

"आमच्याकडं बघुन या वेळेला । जीवदान द्यावं-थोर झाला !" ॥

चाल

शिवराय बोलला खानाला । "बायकांनीं आक्रोश केला ।

म्हणुन देतों जीवदान तुला । पण ऐक माझ्या बोलाला ।

इथं राहणं योग्य नाहीं तुला । शिवाजीचा मुलुख हा झाला ।

तो घेईल तुझ्या जीवाला । जीवदान देतों आज तुला ।

जर ऐकशील एका गोष्टीला । माझ्या संगं गोटाबाहेर चला;

आलं पाहिजे तुम्हां सर्वाला" । खानसाहेब घाबरुन गेला ! ।

हा कोण आदमी घरिं आला । समजेना कांहीं हें त्याला ।

खानसाहेब चालले शिवाजीच्या संग ते वेळा ! ॥

गोटाच्या बाहेर जंवा गेला । तंवा बोलला राजा खानाला ॥

चाल

"धाक ज्याचा बादशाहीला । शिवाजी तोच हा आला ! ॥

जाऊं नको याच्या वाटेला । वाघनखं लाविलं पोटाला ॥

पण आठवण रहावी रे तुजलाम्हणून छाटतों तुझ्या बोटाला ! ॥

आजपासून ऐक बोलाला । म्हण शास्ताखान । आपणांला" ॥असं म्हणून बोट छाटून शिवबा पार झाला !! ॥ मग खान गेला माघारा ।

लाज मोठी वाटली त्याला । तय्यार केलं फौजेला ।

अन् पाठविली पाठलागाला ॥ इकडं शिवाजीनें काय बेत केला ।

धोक्याचा करणा फुंकला । कात्रजच्या घाटांतिल पोत पेटले ते वेळा ! ॥

शिवाजी गेला त्या स्थळा । असं वाटलं यवनी फौजेला ।

अन् कात्रजच्या घाटाकडं गेली पाठलागाला ! ! ॥ ततं जाऊन पाहती त्या वेळा ।

अन् परतले सारे माघारा !! ॥ पर इकडं सिंहगडावरी शिवा पार झाला ॥

चाल

गेला खान फार घाबरुन । पुणं सोडून ।

तळ हालवून । भवानी साहाय्य शिवाजीला ।

यश राजाचं वर्णायाला । शाहीर पांडुरंग झाला ॥४॥

वीराग्रणी मुरारबाजी देशपांडे अर्थात्‌ पुरंदरचा वेढा --- पोवाडा

शाहीर पां.द.खाडिलकर

ज्याच्या कबंधानं भूतळी । तीनशें जण बळी ।

घेतले पुरंदरीं । मुरारबाजी धन्य धन्य सरदार ॥

झाला तीन लोकां वीर तो प्यार । शाहीर पांडुरंग गाणार ॥ध्रु०॥

चौक १

शाहिस्तेखानाची केली पार धुळदाण ।

जरी आला होता एक लक्ष फौज घेऊन ।

बोटें तोडुन शाहिस्ता केला फार हैराण ।

हैराण फार होऊन । पुणें सोडून । गेला जल्दीनं ॥

जसा पाला पाचोळा उडवि पवन लीलेनं ।

किंवा ढग मोठमोठाले एका लहरीनं ।

मेंढयांचा कळप उधळावा जसा सिंहानं ।

तशि थोडी युक्ति योजून । दिला हांकलून । शाहिस्ताखान ॥

केल्या स्वार्‍या अवरंगजेबाच्या मुलखामधून ।

चार दिवस सुरत शहराची लूट मारुन ।

अगणित द्रव्य जवाहीर मोतीं घेऊन ।

भयभीत केला यवन । यवनांची झाली गाळण ।

ध्यानीं मनीं दिसतो सैतान । झोंप ही न छान ! ॥

कोण रात्रीं झोंपेंतून उठती बरळ बरळून ।

पाहती स्वप्न आणि त्यांत शिवा सैतान ! ।

भिंतीला जाऊन थडकती वेगवेगानं ।

आरडती किंचाळून कोण । सैरावैरा धांवती कोण । वस्त्र सोडून ! ॥

शिवाजी डोंगई उंदीर फार लहान ।

तो करतो काय चिरडून त्याला टाकीन---

असा होता बादशहाचा वेडा हो भ्रम । शिवाजीनं केली धामधूम ।

धामधूम झाली पाहून । शाहाचं मन । झालं हो खिन्न ॥

उंदीर नव्हे हा, असे रे जहरी बाण । आला ! आला ! जाइल छातित्‌नं पार घुसून ।

पादशाही करिल हैराण, काळ दारुण ! । दारुण करुनिया रण ।

कणिं करिल यवनकंदन । करिल धुळदाण ॥ चाल ॥

अवरंगजेबाला शत्रु प्रबळ हा झाला ॥ शाहिस्त्याची फजिती ऐकून शाहा लाल झाला ॥

शिवाजीचा कांटा काढण्याचा बेत त्यानं केला ॥ मग बोलला जयसिंगाला ।

"शिवा मोठा पुंड हो झाला । त्यानं मुलूख हैराण केला ॥

हा कांटा मोंगलशाहीला । जर असा वाढूनच दिला ।

तर होईल भारी आम्हांला । मामाचा मोड त्यानं केला ।

प्रतापगडीं खान ठार केला । लुटालूट केली सुरतेला ।

त्यानं केल जेर शिद्दीला ॥ दरारा त्याचा मुलखाला ।

हें विघ्न आमच्या राज्याला । तुम्ही जावं पारिपत्याला ।

दिल्लीरखान तुमच्या मदतीला । कांटा हा काढा या वेळा" ॥

असं बोलला जयसिंगाला । मग शाहा बोलला एकांतीं दिल्लीरखानाला ॥

तुम्ही जावं जयसिंगराजाच्या संगें मदतीला

पण कानमंत्र हा दिला । "नीट ठेवा तुमच्या लक्ष्याला ।

जयसिंग हिंदु हा होईल फितुर शिव्याला ! ॥

हिंदु हिंदु एक होतील होइल घोंटाळा ॥

बारीक सारीक सार्‍या बातमीला । नीट काढा आतां या वेळा ।

नीट ठेवा त्याच्यावर डोळा । आणि स्वारी फत्ते करुन यावं दिल्लीला" ॥१॥

चौक २

मग फौज ऐंशीं हज्जार । पायदळ, स्वार ।

घेऊन पेंढार । मिर्झा राजा आणि दिल्लीर आला ॥

वेगानंच दख्खन देशाला । हिंदवी राज्य चिरडण्याला ॥

मिर्झा राजा आणि दिल्लीरखान । राहु केतु जाण ।

आले जोडीनं । ग्रासाया सूर्यशिवाजीला । हिंदू हिंदूला काळ झाला ।

निखारा अस्तनींत पडला ! ॥ हत्ती घोडे बैल आणि उंट ।

होते अफाट । तोफा घनदाट । थाट माट तेव्हां फार केला ।

आकाशीं धुरळा दाट भरला । सूर्याला पार लोपवीला ॥

चाल

विजापूरच्या आदिलशहाला । अवरंगजेबानं धाडलं पत्र ते वेळा ॥

कीं "करा मदत आतां या वेळा । शिवाजीनं पुंडावा केला ।

अफझुलखान तुमचा ठार केला । देतो हा पीडा मुलखाला ।

हा शत्रु तुम्हां आम्हाला । दोघं मिळून चिरडूंया त्याला ।

मी फौज मोठा धाडली हो दख्खन देशाला ॥

तुम्ही पाठवा फौज या वेळा । दोघं उचल खाऊं या वेळा ।

आणि करुं ठार हो त्याला । सापाचं पिल्लु हा झाला ॥

वेळींच डोकं ठेचुं या आज या वेळा" ॥ आदिलशहा पत्र वाचून खूष फार झाला ॥

फाजलखान फौज देऊन धाडला मदतीला ॥ आणि गेली पत्र कितिकांला ।

जावळीच्या मोर्‍याचे मुलगे-बाजी, अंबाजी-गेले मदतीला ॥

शिवप्पा नाईक बेदनुरचा । जहागिरदार बसवपट्टणचा आला मदतीला ॥

माणकोजी धनगरही आला । कोळीराजे गेले मदतीला ।

शिवाजीचा नाश करण्याला । कुर्‍हाडीचा दांडा गोत्याला काळ हो झाला ॥

कुंपणानं खाल्लं शेताला ! । भावानं मारलं भावाला ! ।

असो असे राजे यवनांच्या गेले मदतीला ॥ जयसिंग दक्षिणेंत आला ।

सासवड गांवीं तळ त्यानं दिला । आणि पुढच्या स्वारीचा विचार त्यानं सुरु केला ! ॥२॥

चाल

"जे वीर पुरुष जाहले । आर्य आपुले ।

सर्व बिघडले । दास ते बनले ।

मनिं मानलालसा धरुनी अंकित झाले ! ॥

चाल

हें असें मला बघवेना, या पुढें ॥

पाहुनी चित्त हें माझें तडतडे ! ॥

निशिदिनीं हृदय हें माझें धडधडे ॥

चाल

क्षणभर मजला चैन देइना क्षात्रधर्म हा भला ।

देह हा या कामीं वहिला ! ॥

चाल

पर राजे आज तुम्ही दया दाखवा मला ॥

हा तुमच्या शब्दाबाहेर नाहीं राहिला ।

जसे वडील माझे तस्सेच तुम्ही हो मला ! ॥

दोन शब्द सांगणं तुम्हांला । हा अधिकार ना मला ! ।

हें धरा पोर पोटाला । आणि क्षमा करा हो मला ।

परचक्र मोठं हें आलं हिंदू राज्याला ॥ हा वृक्ष आम्हीं लावला ।

आतां तुम्ही वाढवा त्याला । मोंगलाचा मुलुख मी देतों परत मोंगलाला ॥

द्या तुमचा सल्ला या वेळां । मी येतों तुमच्या भेटीला" ।असं पत्र धाडलं शिवानं हो जयसिंगाला ॥३॥

चौक ४

ही बातमी ऐकून मोंगल दिल्लीरखान ।

लाल झाला रागानं म्हणे हा जयसिंग कोण ?

तह करणार शिवाजी संगें मोठया ऐटीनं ।

हिंदु हिंदु एक होऊन । मला आतां दूर वगळून ।

शाहाशीं झाला बेइमान । आज संपूर्ण ॥

मग मिर्झा राजाला बोलला दिल्लीरखान ।

"तह नका करुं शाहाच्या हुकमावीण ।

कायमचा कांटा काढायची संधि सोडून ।

कां असें मनीं बिचकतां आज हो आतां ।

धीर सोडून" ॥ जयसिंग बोलला "ऐका हो दिल्लीरखान ! ।

उंदीर नसे हा शिवा, सिंह भीषण । कितिकांना खडे चारुन केलं हैराण ।

कितीकांची मान फाडून । कितीकांचीं बोटं तोडून ।

धूळ चारुन गेला वेगानं !" ॥ मग बोलला राजाला मिया दिल्लीरखान ॥

दाढीवरन्म मोठया तोर्‍यानं हात फिरवून ।

"शिवाजीला झाला सामील तुम्ही आंतून । केला घात फंदफितुरीनं ।

हिंदुला घेरलं हिंदूनं । असं मला सांगतय मन । बोला आपण ! ॥

चाल

वाटेल तें तुम्ही हो करा । बेत तुमचा आवडेना मला ।

मी जातो पुरंदराला । सर करतों पुरंदर किल्ला ।

तुम्ही जावं सिंहगडाला । शिव्याचा धाक नको मला ।

मी धरीन त्याच्या कानाला । अन् फरफटत नेइन दिल्लीला ।

तो कुत्रा करतो काय मला ? । तुम्ही खास फितुर हो झाला ।

म्हणुनि बोलता असल्या बोलाला" । असं म्हणुन चालला दिल्लीर पुरंदराला ॥

डोईची पगडी काढून ठेवली भूमीला । अन् बोलला खान आपणाला ।

सर करिन पुरंदर किल्ला । तरच घालीन पगडी डोक्याला

असा त्यानं निश्चय केला ! अन् मग मोठी फौज घेऊन तिकडं चालला ॥४॥

चौक ५

गडामध्यें पुरंदर गड । मोठा अवघड ।

भयंकर चढ । धडधडे ऊर बघुन त्याला ।

दिल्लीरखान खिन्न झाला । निराशा झडपी हृदयाला ! ॥

पर मोठी हिय्या धरुन । फौज घेऊन । चाल्‌ला जल्‌दीनं ।

पुरंदर किल्ल्याखालीं आला । देश जाळून फस्त केला ।

किल्ल्याला वेढा त्यानं दिधला ॥

चाल

इकडं शत्रु पन्नास हजार । वर मावळे दोन हजार ! ॥

इकडं वेढा घाली दिल्लीर । वर होता बाजी मुरार ॥

पसरला सेनासागर । मधें पुरंदर कमळ ॥

पुरंदर कमळ सुंदर । वर शोभे देव मुरार ॥

चाल

मुरारबाजी शूर सरदार । योद्धा घनघोर ।

शिवबाचा प्यार । झाला तय्यार झुंजण्याला ।

फिकीर जीवाची नव्हती त्याला । किल्ल्याचा बंदोबस्त केला ॥

धान्याची तरतूज केली । किल्ल्यावर भली ।

शस्त्रं जमविली । तोफ चढविली हो बुरुजाला ।

कडेकोट बंदोबस्त केला । झाला तय्यार झुंजण्याला ॥

चाल

मुरारबाजीनं बेत केला । गनीमाचा लोक फार आला ।

भेडसवावं दिल्लीरखानाला । म्हणून पठाणाचा वेष केला ।

मावळा पांचपन्नास मदतीला । रात्री किल्ल्याच्या खालीं केला ।

शत्रुच्या छावणीमंदि शिरला । रखवालदार ठार केला ।

दारुगोळा सारा लुटून नेला । अन् चट्‌कन किल्ल्यावरती गेला ! ।

यवन मग उठला पहांटेला । बघतो दारुच्या कोठाराला ।

अन् मारतोय हात कपाळाला । आज काय दारुगोळा नेला ।

उद्यां काय चोरटा हल्ला केला । परवां ठार केला शिपायाला ।

बभ्रा हा रोजच्या रोज झाला ! । एकदां रात्रीच्या समयाला ।

मुरारबाजीनं, पंचवीस जणं, मावळे घेऊन, वेश बदलून हल्ला केला ।

पठाण सार होता झिंगलेला । मुरारसिंहानं हल्ला केला ।

तलवारीनं चिरलं कितीकाला । यवन खडबडून जागा झाला ।

हात मग मारतोय तोंडाला । तोबा ! तोबा ! सैतान हा आला ।

पळतो वाचवायला जीवाला । कितिक दरीमंदि खाली पडला ! । ऐकावं र दादा ॥

चाल

मग झाला रागानं लाल दिल्लीरखान ।

म्हणे ठार करिन सैतान तलवारीनं ।

उद्यां शर्थ करुन हा खास गड जिंकीन

वर्णन पुढच्या चौकांत पुढं सांगीन ॥५॥

चौक ६

निकराचा हल्ला मग केला । सुरुंग लावला ।

गडाच्या बुरुजाला । तोफांचा मारा वरनं झाला ।

सुरुंग लावणारा ठार केला । मुडद्यांचा मोठा ढिगारा पडला !।

धडधडा धुम् धुम् धडधडा । आवाज कडकडा ।

गोळे धडधडा । धडकती येऊन बुरुजाला ।

बुरुज कोसळला धरणीला । आणीबाणीचा काळ आला ! ॥

चाल

शत्रु होता पन्नास हजार । वर मावळे दोन हजार ॥

तरी त्यांनीं केलं बेजार । दिल्लीर झाला दिलगीर ! ॥

परि फौज होती अनिवार । मुरारबाजी काय करणार ?

तरी त्यानं केला बहु जोर । कितीकांना केलं हो ठार ! ॥

चाल

ढांसळला बुरुज किल्ल्याचा ! मुरारबाजीचा ।

बुरुज हृदयाचा । त्वेषानं लालेलाल झाला ! ।

मावळे घेऊन हल्ला केला । गातों मी त्याच्या पोवाडयाला ॥

शत्रूंचा हल्ला उधळला । मुरार परतला ।

खान वेडा झाला । बघून मुराराच्या प्रतापाला ।

मग त्यानं दुसरा बेत केला । पुरंदर किल्ला जिंकण्याला ! ॥

चाल

पुरंदरच्या एका बाजूला । एक किल्ला होता दुसरा ।

वज्रगड म्हणती हो त्याला । त्या किल्ल्यावरनं डागाव्या तोफा या वेळा ॥

मग पुरंदर किल्ल्याला । थडकेल जोरानं गोळा ।

असा बेत खानानं केला । अन् तिकडं मोर्चा फिरविला ।

बाबाजी बोवाजी वरती होता त्या वेळा । यशवंतराव त्याचा हो भाऊ धावला मदतीला ॥

दोघांनीं नेट फार केला । धारातीर्थीं देह टाकला ।

खानानं किल्ला सर केला । तोफखाना वरती चढविला ।

काळ मोठा कठिण हा आला । आतां पुरंदर खास गेला ।

असं वाटलं मुरारबाजीला । निकाराचा विचार त्यानं केला ।

मग बोलला आपल्या बायकोला । सांगेल शाहीर आतां पुढच्या चौकाला ॥६॥

चौक ७

मुरारबाजी बोले बायकोला । "आला हा घाला ।

आज किल्ल्याला । शिकस्तीचा यत्‍न मी केला ! ॥

किल्ल्याचा बुरुज तडकला । ढांसळून गेला ।

शत्रु हा आला । निकराचा काळ ग आला ।

थोडासा उशीर जर झाला । होईल घोंटाळा ।

आज या वेळा । सर करील शत्रु हा किल्ला,

लाज आम्हांला ॥ जर किल्ला हातचा हा गेला ।

डाग कीर्तीला । जन्मभर जडला ।

कसं काळं तोंड दाखवूं मी शिवरायाला ॥

जावं अस्सं याच घटकेला । शत्रु चिरण्याला ।

वाटतंय मजला । धारातीर्थी देह टाकून जावं या वेळा ॥

चाल

पर पाश एक जीवाला । प्रेमाचा तुझ्या ग झाला ! ॥

कसं तोडू प्रेमपाशाला । ही एक चिंता ग मजला ॥

चाल

तव नेत्र सोडिती बाण । जाती भेदून ।

हृदय या वेळा । तव लाल अधर मोहती सखे !

हृदयाला ! ॥ करपाश तुझे बलवान ।

गुंतलों हरिण । तडफडे मीन ।

कर्तव्यकर्म परि असं आलं दारुण ॥

चाल

काळ इतक्या वर्षांचा गेला । सुख नसे तुझ्या वांटयाला ॥

सदानिदा जातों स्वारीला । सोडुनी सखे ! मी तुजला ॥

काय पाप पूर्वजन्मीला । केलस ग ठाव कोणाला ?

म्हणुन पती असा हा आला । सखये ! ग तुझ्या दैवाला" ॥

चाल

बोलला असे हे बोल । प्रेम-कल्लोळ ।

हृदयिं खळखळले ! । भेटाया तिला नेत्रांतुन मग ते आले ! ॥

प्रेमानं मिठी मारुन । झाला एक क्षण ।

स्तब्ध ते वेळा । पण अश्रु टपटपा गालावर गळला ! ॥

चाल

प्रियपत्‍नी बोले मग त्याला । जरि जीव व्याकुळ झाला ॥

"नका होऊं खिन्न या वेळा । प्रेमाच्या तोडा पाशाला ॥

चाल

तुम्ही शूरवीर रणधीर । पंचानन रणझुंजार ! ॥

किती जन्म नवस मी केले । म्हणुनी मी भार्या झाले ॥

अजि नाथ ! भाग्य मम फुललें । म्हणुनी मी भार्या झालें ॥

अबलेला तुम्ही वरलें । हें शरीर पावन केलें ॥

चाल

कर्तव्यकर्म आचरतां । धर्मार्थ तनू ही पडतां ।होईल सौख्य मज नाथा ॥ झणी तोडा मम पाशाला ॥

हें राज्य नसे शिवबाचें । हें राज्य देव-धर्माचें ! ॥

माजलें बंड यवनाचें । होतात हाल अबलांचे ! ॥

पर्व हेंच स्वातंत्र्याचें । धन्य, जो रणावर नाचे ॥

चाल

मी वीरपत्‍नी, तुम्ही वीर । गाजवा रणीं समशेर ।

होउं द्या युद्ध घनघोर । जा पाशा तोडुनी सारा ! ॥

पण क्षण एक गडे ! थांबाबं ! मी पंचारती आणीन ॥

अक्षता भाळिं लावीन । प्रेमानं दृष्ट काढीन ॥

डोळाभर मग पाहीन । मग निरोप मी देईन" ॥

चाल

बोलली अशी ती अबला । डोळ्यांतुन अश्रु गळला ।

गद्‍गदा कंठ गहिंवरला । ओंवाळुनि मग नाथाला ।

जाहली धन्य ते वेळा ! ॥७॥

चौक ८

जगदंबा मातेचं सत्वर करुनी स्मरण ।

प्रिय पत्‍नीकडे शेवटली दृष्टि टाकून ।

शेंपाचशें मावळे रणवीर संगें घेऊन ।

ढाल फिरंग करिं घेऊन । चालला वेगानं । शिवाचा बाणा ॥

जसा सिंह चवताळुन दरीमधुन तो यावा ।

एकाच झडपेनं मस्त हत्ती फाडावा ।

तसा दिसला डोळ्याला मुरारिचा देखावा ।

तो प्रसंग कविला कां न च स्फूर्तिद व्हावा ?

का वीर्यवृत्तिचा मूर्तिमंत हा पुतळा ! ।

अभिमन्यु बाळ हा किंवा दुसरा नटला ! ।

कां प्रलयसिंधु हा शिखरावरुनी सुटला ! ।

यवनांचा कराया अंत । जोरानं जात ।

तेज उधळीत । आज या वेळा ! ।

तंवा बसला होता हत्तीवर दिल्लीरखान ।

त्यानं पाहला वरनं येतांना मुरार खवळून ।

थरथरलं ऊर खानाचं त्याला पाहून ! ।

म्हणे, "सिंह आला रे आला । फाडाया मला । जबडा उघडून" ॥

खणखणले भाले तलवार । झुंजती वीर ।

म्हणती हर हर महादेववीर गुंग झाला ।

लढाईचा कैप त्यांना चढला । प्रेतांचा ढीगच्या ढीग पडला ।

हाडकारक्तांचा काला झाला ! ॥ केली शर्थ मुरारबाजीनं ।

कितीक कापून । आला जोरानं । खानानं पाहिलं समोर त्याला ।

होता रक्तानं मुरार न्हाला । जणूं काय सूर्य उगवणारा ! ॥

चाल

खान बोलला मुरारबाजीला । "पाहुन रे तुझ्या शौर्याला ।

हा खान खूष फार झाला । घे कौल आज या वेळा ।

अन् ये शरण आज खानाला । शिफारस करीन शाहाला ।

अन् चढवीन मोठया हुद्याला । नाहींतर मरशील व्यर्थ या वेळा" ॥

ऐकून शब्द खानाचे मुरार लाल झाला ॥ मग बोलला वीर खानाला ।

"काय येऊं शरण तुर्काला ? । काय विकूं देह मानाला ।

हा देह दिला धर्माला । हा मुरार बळी पडणार नाहीं मोहाला ॥

एक वेंळ गळेल भूमिला अढळ ध्रुव तारा ॥

पण मुरारबाजी हा सदा अढळ रे झाला ! ॥

देहाचा चूर जरि झाला । तरि फिकीर नाहीं रे मला" ।

असं बोलला वीर खानाला । खान हत्तीवरनं उतरला ।

अन् दोघांचा संग्राम झाला । गर्जती वीर ते वेळा ।

कानठळी बसली कानाला ! । दैवाचा घाला पण आला ! ।

मुराराच्या हातावर वार जोराचा झाला । ढाल पडली खालीं भूमिला ।

मग शेला बांधला हाताला । आणि वीर गर्जूं लागला ।

खानावर वार त्यानं केला । पण तो वार निसटून गेला ।

इतक्यांत खानानं सोडलं एका तीराला ! ॥ तीर लागला मुरारबाजीला ।

तीरानं तोडलं डोक्याला । शिरकमळ पडलं धरणीला ! ॥

तरी धडानं कहर तो केला । धूळ चारली तीनशें यवनाला ।

मग कोसळलं धड धरणीला ॥ जीवानं सोडलं देहाला ।

स्वातंत्र्यदेविच्या गळ्यांमधुन मणि गळला !" ॥

धर्मार्थ देह खर्चून धन्य तो झाला !! ॥८॥

चौक ९

देहाचे तुकडे जमविले । किल्ल्यावर नेले ।

मावळा मग बोले । मुरारबाजीच्या बायकोला ।

"बाईसाहेब ! मोठा घात झाला । जिवाचा मोहरा ठार झाला ! ॥

प्राण आमुचा सोडुन गेला ॥ झाला घोटाळा ऐन वेळेला ।

खान घेईल आतां किल्ल्याला ॥ काय आम्ही करावं बोला ।

अशा निकराच्या समयाला ? ॥ नाथाचं प्रेत पाहून ।

साध्वीचं मन । भरलं दुःखानं । एक क्षण आली घेरी तिजला ।

डोळ्यांतुन अश्रु फार गळला । अंगाला कंप सारा सुटला ! ॥

चाल

पण दुःख सारं आवरुन । त्वेषानं लाल होऊन ॥

बोलली साध्वी जोरानं । पळतांना मावळा पाहून ॥

"कुठं जातां धीर सोडून । मी आलें खड्‌ग घेऊन ।

द्या दुष्ट शत्रु हांकलून । जा ! मरा ! झुंज झुंजून" ॥

चाल

असं बोलली साध्वी मावळ्यांला । नवर्‍याच्या प्रेतावर शेला ।

टाकून गेली युद्धाला । मावळ्यांना चेव तंवा आला ।

अन् करती घोर युद्धाला । खानानं पाहिलं वर तिला ।

अन् तोंडात घातलं बोटाला । मग बोलला आपला आपणाला ।

"सैतानखाना हा झाला । आतां औरत आली लढण्याला ! ।

सोडावं आतां नादाला । काढावं आतां वेढयाला ।

सर करणं असल्या किल्ल्याला । फार बिकट काम हें मला" ।

असं म्हणून वेढा काढून खान चालला ॥ मग साध्वी आली माघारा ।

पालखींत घातलं प्रेताला । अन् पालखी घेऊन चालली रायगडाला ॥

शिवराज आले सामोरा । गडावर नेलं पालखीला ।

शिवराज व्याकुळ झाला ! । खालीं काढलं त्यानं प्रेताला ।

अन् ढळढळां रडूं लागला ! । जिजाबाई बोलली साध्वीला ।

"बाई ! उपमा नाहीं ग तुला । देशाला प्राणपति दिलास् ।

अन् राखलस् ग तूं ही किल्ल्याला ॥

चाल

त्वत्समान शंभर अबला । जर मिळतिल या देशाला ॥

जाईल दुःख विलयाला । चमकेल सुखाचा तारा ॥

चाल

तव पती जाहला धन्य ! । या समान कोणी न अन्य ।

चिरकाल जोडलं पुण्य । हा वंद्य तीनि लोकांला" ॥९॥