अजून उठते मृद्गंधातून रक्तझडिची साद,
दरीत घुमते वादळ धरते रणघोषांचा नाद,
थाप कड्यावर देत रंगते एक कथा शाहिरी,
सात चिरंजीवांनी केली स्वारी मृत्यूवरी,
पुन्हा अनावर खिन्न मनावर उठते ऋचा गभीर,
सात सतींचे पुण्य आणखी सप्तर्षींचा तीर,
अजुन उठतो सह्यगिरीच्या कुशित हुंकार,
आवरता हुंदके दाटतो दरीत अंधार ,
लकेर ये अतृप्त स्वरांची चुकार वार्या,वरी,
सात चिरंजीवांनी केली स्वारी मृत्यूवरी !
सात चिरंजीवांनी केली स्वारी मृत्यूवरी !
excellent poem......
ReplyDelete