Monday, June 22, 2009

छत्रपति शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका

चारि चारिचौकी जहाँ चकत्ताकी चहूं और
साँज अरु भोर लगी रही जिय लेवा की
कँधे धरी कांवर, चल्यो जब चाँवसे
एकलिए एक जात जात चले देवा की
भेंस को उतारी डार्यो डम्बर निवारी डार्यो
करयों भेंस और जब चल्यो साथ मेवा की
पौन हो की पंछी हो कि गुटखा कि गौन हो
देखो कौन भाँति गयो करामात सेवा की

-कविराज भूषण

अर्थ :

चारी बाजूला या चुग़ताई वंशाच्या - चकत्याच्या म्हणजेच औरंगजेबाच्या प्राणघातक चौक्या दिवसरात्र बसलेल्या आहेत. कावड खांद्यावर घेऊन एक एक जण मोठ्या डौलाने देवाकडे जात आहेत. अशा वेळी त्यांनी ( छत्रपति शिवाजी महाराजांनी ) आपला वेष उतरवला, अवडंबर टाळलं, वेष बदलला आणि मेवा मिठाईच्या त्या पेटार्याबरोबर ते निघाले आणि पळून गेले. छत्रपति शिवाजी महाराजांची ही करामत बघून ( आग्र्याचे ) लोक थक्क झाले. त्यांना कळेना की ते ( छत्रपति शिवाजी महाराज ) वार्याच्या झुळकीसारखे गेले की पक्ष्यासारखे उडून गेले की गुटखा खाऊन एकदम गुप्त झाले.

No comments:

Post a Comment