Monday, June 22, 2009

शाइस्तेखान..

दच्छिन को दाबि करि बैठो है ।

सईस्तखान पूना मॉंहि दूना करि जोर करवार को ॥

हिन्दुवान खम्भ गढपति दलथम्भ ।

भनि भूषन भरैया कियो सुजस अपार को ॥

मनसबदार चौकीदारन गंजाय महलनमें ।

मचाय महाभारत के भार को ॥

तो सो को सिवाजी जे हि दो सौ आदमी सों ।

जीत्यो जंग सरदार सौ हजार असवार को ॥

-कविराज भूषण

अर्थ :

शाइस्तेखान दक्षिण हस्तगत करून पुण्यात ठाणे देऊन बसला. या वेळी हिंदूंचा आधारस्तंभ व किल्लेदारांच्या एका सेनानायकाच्या तरवारीस जोर चढला अन् त्याने अपार सुकिर्ती मिळवली. (ती अशी मिळवली की)

मोठमोठ्या मनसबदारास व चौकिदारास जखमी करून त्याने महालांत शिरून महाभारत माजवण्यास (युद्ध करण्यास) सुरुवात केली !

भूषण म्हणतो, कि हे शिवराया, तुझ्या शिवाय दुसरा पराक्रमी कोण आहे ? ज्याने फक्त दोनशे माणसांनिशी लाख स्वार असणार्‍या सरदाराबरोबरचे युद्ध जिंकले.

No comments:

Post a Comment